Sunday 27 December 2015

हिवाळा

मन भुलले मन फुलले
मज रमवी उषा ही धुक्यात
झोंबतो थंड हा वारा
फिरता रानावनात !
रोमांचित होते ,शहरुन येते
जव होतो स्पर्श जलास
आनंदी लहर ही उठते
डिवचते स्वच्छंद मनास!
कुरणावरती ग रानसाजणी
हरएक पानी ग रानसाजणी
जणु सांडीयले मोती कुणी
जे सांगती न बोलता
जगाहो पळभर इतरास आनंदुनी
..........
हिच कविता

मन भुलले रे मन फुलले रे १२
मज रमवी उषा धुक्यात १०
झोंबतो सुगंधीत हा वारा १०
जव फिरता रानावनात ! १०
रोमांचित होते रे,शहरुन येते रे १२
जव होतो स्पर्श जिवनास १०
आनंदी लहर ही उठते १०
डिवचते स्वच्छंद मनास! १०
कुरणावरती चमचम करती १२
हर पानी ग रानसाजणी १०
जणु सांडीयले मोती कुणी १०
सांगती न बोलता जगाहो १०
दो क्षण जगास आनंदुनी१०

बाजीराव ©

Sunday 13 December 2015

ये परतुनी भाग दुसरा मँरेथॉन

ता. 11डिसेबर 2008

काय रे यड्या काय झालाय तुला!
आरे विनू मी तुला बोलतोय!
.......या रवीच्या जोराच्या बोलावण्याने आणी धडधड हलवण्याने विनुची तंद्री भंगते..
आं अं अरे दमलोय रे थोडा तर सहजच लागल ध्यान शुन्यात ..त्यान सारवासारव तर केली पण डोळ्यातील भाव सर्व काही बोलत होते आणी ते ताडणाराही अकुशल नवता तो होता.
रवीराज अभयसिंह जमदाडे उर्फ रवी किंवाRAJ
विनय चंद्रराव देशमुख उर्फ विनु उर्फ VCD
b.sc microbiology  द्वीतीयवर्षाचे विद्यार्थी .
आज दोघेही मँरेथॉन रनींग करुन आले होते पण रवीला विनुचं वागन जरा वेगळच वाटु लागल होतो.
कधीही बडबड करणारा आज एकांती बैसत होता
ज्याच मैदानात इतरत्र कधीच लक्ष जात नवते  त्याच्या नजर कुणाला तरी शोधताना दिसत होती....
आता तर काय हा ....
इतके दर्दभरे गाणेही ऐकत होता......

काय करु
काय करु.....नुसत
नुसत  थैमान मांडल होत विचारांनी रवीच्या डोक्यात ....,.,.
शेवटी अवाज चढवण्याचा प्रयत्न करतो पण बळेच शांत होऊन  विचारतो....
आरे काय झाल आज तु 8kmपर्यंत लिड करत होतास आणी हरलास कसा ?
मला कळेनासं झालंय
मोठ्यामोठ्या मँरेथान मारल्यात आपण ही तर किरकोळ होती ,काय झाल आस .....सांगशील का ,,अजुन नकोस त्रास देउस please !
शेवटी रवी भावनिक होतो डोळ्यात पाणी तरळताना स्पष्ट दिसत होत .आणी हृदयाची कालवाकालव
त्याच्या शब्दातुन स्पष्ट जाणवत होती.....
कारण दोघेही अगदी शाळेपासुन खेळाडु म्हणुन असोत की अभ्यासात बरोबरच असत.    .....सुरुवातीस अनेक हार सोबत पचवल्या दोघांनी पण निराशा त्यांच्या मनाला कधी स्पर्शु शकली नाही
कारण
त्यांचा प्रेरणेचा स्रोत होता सह्याद्री ,
तोच सह्याद्री ज्यानी दिल्लीस तुडविण्याची जिद्द भरली होती ह्यांच्याच पुर्वजात.
आज ही तो जिद्दीच अमृत देतोच फक्तृ ते मिळवायला मराठी माणसासारखा काळजाचा कटोरा हवा!
असे हे दोघे मराठ्यांचे मन जरी सह्याद्रीच्या कड्यांसारखे  असले तरी हृदयाच्या जागा तर दरीप्रमाणे होत्या खोल,
अगदी खोल
पण त्यात अजुन प्रेमाचा झरा नवता उगम पावला.असो 
नंतर हे विजय मिळवीत गेले .....पण म्हणतात ना
कुशल विजृयी वीरास पराजय मृत्यू प्रमाण
ेवाटते तसेच
तसच ही हार देखिल जिव्हारी लागली होती
अथवा ती लागयला हवी पण
तरीही रवीला काइतरी वेगळच फरक जाणवत होता.....विनुमधे
ते विनुच्या लक्षात आलं तो पटकन भानावर आला आणी
आणी मग विषय बदलायच म्हणुन उठला , आणी जवळची बियरची बॉटल घेतली व आणी म्हणाला
चल सेलीब्रेशन करु यार !
तु भी क्या दिल पे लेता है !
देख ये जिंदगी तो किसी किसी शिकारी की तरह है
कभी शिकार मिलती है कभी नही
हमे तो बस कोशीश करनी चाहीये
बाकी सगळी आई जगदंबिकेची इच्छा !

Thursday 10 December 2015

तो काळ!

होती अशीही गंमत न्यारी
त्या  कालाची त्या वेळेची!
वसे चिमण्यांचा थवा आनंदे
बोले धेनु हंबरुनी!
काटेरी असुनी ती बोरं भरीची
ती खार दुडदुडे तिजवरती!
!१!
होती अशीही गंमत न्यारी
त्या  कालाची त्या वेळेची!

पहाट होता एकु येई आर्या मोरोपंतांची
ढळता सांज गायी आई गिते ती अंगाईची
त्या अंगाईला साथ हाताची
नाद नवा उदया येई
जशी निद्रादेवी ये ई तेव्हा
तशी येतच नाही आता ही....!२!

होती अशीही गंमत न्यारी
त्या  कालाची त्या वेळेची!

शाळा होती नदी पल्याडे
ते गुरुजी होते टोपीवाले
दांडी नित्याची त्या शाळा
काय गरज हो आम्हाला
तो निसर्ग आसेल जर गुरु आमुचा
आकाश असायचे छत त्याची
!३!
होती अशीही गंमत न्यारी
त्या  कालाची त्या वेळेची!

आठवता  गतकाल आपला
ते चेहरे अगणित गजबजती
उठतो आठवांचा कोलाहल अन
आग लागते हृदयासी
सरले आपले दिनसुखाचे
सुहृदय अंतरले हो मजसी
फिरुन सांगते हे मन मजला

होती अशीही गंमत न्यारी त्या काळाची  त्या वेळेची!
omi©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...