Showing posts with label इतीहास गोष्टी. Show all posts
Showing posts with label इतीहास गोष्टी. Show all posts

Sunday, 22 October 2017

अज्ञात रणरागिणींच्या शोधात १..रणचंडी झलकारी बाई.....


जब तक झाँसी स्वतंत्र ना करु,
न शृंगार करुंगी न सिंदुर लगाउंगी
अशी शपथ घेणारी तेजस्वी शलाका १८५७ च्या स्वतंत्र्ययुद्धात आपली चमक सोडुन गेली ज्या चमकेने सबंध पाश्चात्त्यांचे डोळे तेजाने दिपुन गेले ती झांशीच्या महालक्ष्मी ची सखी रणचंडी झलकारी बाई !
झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईंच्या दुर्गा या स्त्री दलाची सेनापती !
प्रखर निष्ठा आणी मुर्तीमंत शौर्य उपजत घेऊन आलेली युद्धशलाका .
झलकारीबाईंचा जन्म २०नोवेंबर १८३० रोजी भोज या झाशी नगराच्या वायव्येस स्थित छोट्याशा गावात झाला .
वडीलांचे नाव मुलचंद  तर आईचे धनिया असे होते. त्या कोरी या समाजातील होत्या . त्या आईवडीलांच्या एकुलती एक संतान .वर्णाने सावळ्या परंतु रुपाने सुंदर अशी ही कन्या जन्मतः शुर होती कारण
भोज हे खेडे जंगलकिनारी असल्याने गावकर्याना हिंस्र पशु व लुटेरुंच्या टोळ्याना सतत तोंड द्यावे लागत असत.म्हणुन सर्व लोक शस्त्र निपुन होते.
झलकारीबाईं चे वडील झाशी संस्थानात सैनिक होते ते उत्तम तीरंदाज ही होते.आई देखील तशी शुर होती ,उभय दांपत्य हे धार्मिक वृत्तीचे म्हणुन हाच गुण झलकारीबाईंमध्ये देखील उतरला होता .
त्याचप्रमाणे मुलचंदने आपल्या मुलीस युद्धकलेचे  संपुर्ण ज्ञान दिले होते .
तिच्या शौर्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात
त्यातीलच एक अशी की,
एके दिवशी झलकारीबाई गुरे घेऊन रानात गेली असता तिच्यावर चित्याने अचानक झडप घातली
तेव्हा धैर्यवान मुली बाजुला उडी मारुन स्वतःचा बचाव केला आणी हातातील लाठीने चित्याच्या नाकाजवळी वर्मावर असा प्रहार केला
की चित्ता जागेवरच निपचित होऊन पडला .नंतर तिने त्याला लाठीने इतक मारल की तो त्यातच मेला .
या कृत्याची सगळीकडे प्रशंसा केली गेली
तिच्या शौर्यगाथेतील एका घटनेत तिने गावच्या मुखियाच्या घरावर रात्री दरोडा घालण्यास आलेल्या दरोडेखोराला लाठीनेच बदडले होते आणी नंतर मुखियाने तिला आपली मुलगीच मानली .त्यानंतर तिची सगळीकडे प्रशंसा झाली .
नंतर झलकारीबाई वयात आल्या नंतर पुरणचंद ह्या झाशीसंस्थानात तोफखान्यावरील गोलंदाजाशी तिचे लग्न लावले गेले लग्नात मुखियाने गावभोजन दिले
आणी लग्नानंतर उभय दांपत्य झाशीस राजाराणीचा आशीर्वाद घेण्यास महालात गेले आणी इथे दोन दुर्गा प्रथमच एकमेकीना भेटल्या झलकारीबाई तील तडफ राणी लक्ष्मीबाईंनी हेरली आणी आपल्याच पदरी नोकरीस ठेवुन घेतले
इथेच एका अध्यायाची अथश्री झाली

राणीने सह्स्रचंडी याग करण्याचे काम झलकारीस दिले तो चंडीयाग होता
दुर्गादल स्थापिण्याचा आणी प्रमुख होती प्रत्यक्ष रणदुर्गा झलकारीबाई .
पुढे सन १८५७ उगवले .क्रांतीचे संवत्सर हे
सकल हिंदुस्थान बळावले फिरंग्यांविरुद्ध .
झाशीच्या किल्यावरुन महालक्ष्मी क्रुद्ध होऊन कडाडली
मेरी झासी नही दुंगी !
आणी
सहस्त्रचंडी यागाच्या ज्वाळेतुन निघालेल्या ज्वालाप्रमाणे सहस्र दुर्गा सहस्त्र भैरव झाशी च्या किल्यावर लढण्यास सिद्ध झाले .
23मार्च१८५८ सर ह्युजच्या नेतृत्वाखाली इंग्रजी तोफा गडावर आग ओकु लागल्या .
रण तुंबळ माजले .
खाशी राणी लक्ष्मीबाईंनी पुरुषी वेशात शत्रुसैन्यात घुसुन धडक मारली नंतर परत किल्यात येत्या झाल्या .
झलकारी विजेसारखी लढत होती फिरंगी कापत होती
गुप्तहेरांचे जाळे व बातम्या अचुक पोचवत  होती .
आणी घात झाला .
हिंदुस्थानचा अभिशाप फळास आला .फितुरी झाली. शत्रु किल्यात घुसू लागला .
झलकारीबाईनी दुलाजी ठाकुराची फितुरी राणीच्या कानी घातली
राणीने शेवटची बैठक घेतली ,खाशी मंडळी होती अंती झलकारीबाई बोलल्या
राणीचा वेश चढवुन मी किल्ला लढवावा .राणीने खाशा लोकांसहीत येथुन सुरक्षीत जागी जावे .आणी क्रांती कायम राखावी
जोपर्यंत झाशी स्वतंत्र होत नाही
ना मी शृंगार करेन नाही सिंदुर लावेल
हे जीवन स्वतंत्र्यासाठी .
राणी गहीवरलि परंतु रात्र वैर्याची समय असा अवघड पडलेला भावनांसाठी वेळ नव्हता राणी लक्ष्मीबाईंनी किल्ला सोडला परंतु महालक्ष्मी नसली तरी महाकाली अजुन किल्ल्याच्या तटावर अजुन होती
शेवट पर्यंत लढत राहुन शेवटी पकडली गेली .दुलाजीच्या माणसानी तिला ओळखले होते
लगेच तिने त्याच्यावर गोळी झाडली ,घोडा हलला आणी गोळी इंग्रज सैनिकास लागली या घटनेने ह्युज चिडला .
त्याने तिला कैद करुन पहार्यात ठेवले परंतु पिंजऱ्यात राहील ती वाघिण कसली
तीने पहार्यातुन सुटका करुन किल्याकडे पळ काढला
सकाळी ह्युज किल्यावरचे दृश्य पाहुन अवाक झाला .ते दांपत्य
पुरणचंद आणी झलकारीबाई तोफ लावत होते .
झटकन ह्युजने इशारा केला एक गोळी आली आणी पुरणचंद च्या छातीत लागली तो जागेवर गतप्राण झाला परंतु तरीही झलकारीबाई नी तोफ उडवली त्यात बरेच इंग्रज मेले  अंती एका इंग्रजी तोफगोळा लागुन तिच्यादेहाचे तुकडे आणी रक्ताचा अभिषेक तिथेच किल्यावर झाला क्रांतीची विज भयंकर कडकडाट करुन अनंतात विलीन झाली .

बाजी©

Friday, 23 June 2017

निषेध

पाकचा निषेध !
  गेले साठ सत्तर वर्ष आम्ही फक्त निषेधच करतो !
सैनिक मरतात ,आमची कामचलाऊ देशभक्ती  दोन दिवस आठवण ठेवतो पुन्हा आपल जस आहे तसच होतं
कोणाला घेण देण राहत नाही
आम्ही कधी पाकची असहकार करा ,शत्रुराष्ट्र घोषीत करा अशा मागणीचे विराट क्रांती मोर्चे कधीच काढत नाही
काढले तरी ते कोण्या पार्टीचे स्टंट असतात ,तरी ते काही विराट सोडा भव्य पण नसतात कारण आम्हाला शहीदांसाठी ,देशासाठी वेळ नसतो
आम्हाला कामे असतात महत्वाची
आमचा धंदा ,नोकरी मुलबाळ,बायको ,गर्लफ्रेंड ,शाळाकालेज यामधुन देश या गौणमात्र गोष्टीसाठी आणी सैनिकासारख्या फक्त सहानुभुतीच्या माणसासाठी कुठे वेळ असतो ,
आमच्या जाती साठी आम्ही लाखो ने जमतो ,
क्रिकेट साठी रस्त्यावर भांडतो ,
धर्मासाठी एकमेकांचे जीव घेतो परंतु कधी एकदा तरी
देशहिताच्या मागणी साठी एकत्र येउन सरकारवर दबाव आणतो का ?
तर नाही
भारताचे तुकडे पडले त्याला कारण आपणच !
कारण अगदी निसर्गसिद्ध नालायक नागरिक ,
आम्ही शेताच्या बांधावरुन एकमेकाचे गळे चिरतो परंतु हिच गोष्ट जेव्हा दुसर्या देशासोबतच्या बांधाची असते तेव्हा आम्हाला अहिंसेचे पाठ आठवतात !
कारण तो मुद्दा वैयक्तिक स्वार्थाचा नसतो म्हणुन
पण हिच गोष्ट आम्ही बांधावर ग्राह्य धरत नाही कारण वैयक्तिक स्वार्थ !
देशभक्ती म्हणजे क्रिकेट नसते ,सैनिक शहीद झाल्यावर दोन दिवस पोस्टने नसते किंवा पंधरा आगस्ट ला फक्त झेंडावंदन करणेही नसते
हा देशप्रेमाचा हे सर्व एक भाग असेल
पण देशभक्ती कशात असते ?
देशाचा प्रत्येक प्रश्न माझ्या घरातला माझा प्रश्न वाटायलाच हवा
देशाचा शत्रु म्हणजे चीन सारखे देश मोठे होतील याला कमीत कमी हातभार लावणे
आपली संस्कृती ,आपल्या चालीरिती आपल्याला कधी इतरांपेक्षा  गौण वाटु नयेत
ऐतीहासिक वारसा सांस्कृतिक वारसा आपला इतीहास या विषयी अभिमानच बाळगणे
जग कितीही सुंदर असो माझा देश कितीही गरीब असो परंतु तोच श्रेष्ठ ही भावना
माझी जात धर्म देशाहुन मोठा वाटु नये
स्वार्थासाठी कर कर्ज बुडवुन देशाची हानी न करणे यासारखी असंख्य गोष्टी आहे विस्तारभयास्तव  थांबवितो !

जय हिंद !
जय भारती !

बाजी©
omkapandav.blogspot.com

Friday, 19 May 2017

ब्राह्मण प्रशस्ती बुधभुषणम्

शंभाजी महाराज ब्राह्मणांविषयी बुधभुषणं मध्ये काय म्हणतात ते पाहावे.
शंभुराजेंचेच ब्राह्नणाबद्दलचे बुधभूषणममधले श्लोक .
शंभुराजेकृत बुधभूषणम् आणि ब्राह्मण
ब्राह्णण समाजाचा द्वेष करणार्यांना शंभुराजे स्पष्ट पणे बुधभूषणम मध्ये खालीलप्रमाणे सांगतात
अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत: !
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्नणश्चैव विरुद्ध्यते !
(खालील) ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किॅवा त्यांच्या कडून अडविला जातो,
ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति !
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति !
३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिॅसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.
नैतान्स्मरन्ति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति !
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत् !
७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.
बुधभूषणम् - ३ रा अध्याय - १२ ते १४ श्लोक
दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च !
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च !
दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी, आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवाव.
ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु: !
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता !
ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादि स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.....
इति श्रीशंभुराजे

Wednesday, 17 May 2017

असे निच होते मोगल

औरंगजेब पण राजांना पुरता ओळखुन होता
कारण पुढील पत्रातुन सहज लक्षात येतय की औरंगजेब रयतेचा छळ मांडुन शिवाजीराजाना डिवचतोय ,
त्याला माहीती असाव ह्या राजास गडकोटाहुन सकल राज्याहुन ही प्रजा प्रिय .
एरवी स्वतःस रहमदिल जिंदापीर म्हणविणारा
      माणसांची बेरहम कत्तल करण्याचे हे आदेश देतो
आणी एकीकडे मात्र चटया विणीत,टोप्या विणुन त्या विकुन येणाऱ्या पैशात उदरनिर्वाह करतो असे ढोंग करतो
स्वतः मनुची देखील हेच म्हणतो की
  आपण सन्यस्तवृत्तीचे आहोत असे ढोंग करी !
या नंतरही तो पीर कसा !
आपल्या कडील संतांची व्याख्या (समःशत्रौचमित्रेच....)
बहुधा यांच्याकडे चालत नसावी म्हणुननच हा सन्याशी कत्तलीचे आदेश देतो
एक गोष्ट मात्र निश्चित असावी की
मराठी सैन्याच मानसिक बल कमी करण्यासाठी आणी दहशत बसविण्यासाठी हा आदेश आहे !

संदर्भ
शिवकालीन पत्रसारसंग्रह
असे होते मोगल..

Monday, 8 May 2017

टुर्सची लढाई आणी युरोपचे बदलेले भविष्य

टुर्स ची लढाई आणी युरोपचे भविष्य !
युद्ध म्हणजे संघर्ष
मग तो प्रत्येक जीवास जगण्यासाठी करावाच लागतो ,कारण तो स्वतःच आस्तीत्व टिकवण्याचा त्याचा प्रयत्न असतो
काही युद्धे ही अशीच निर्णायक असतात ती खुप भीषण नसली तरी परिणाम दुरागामी सोडतात ज्यामुळे जगाचे भविष्य बदलते
अश्या युद्धांमधे
टुर्स च्या युद्धाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण ह्या युद्धाचे परिणाम आजही आपल्याला दिसता ते ख्रिस्ती धर्माच्या युरोपातील अबाधीत आस्तीत्व स्वरुपात
ह्यामुळे अरबांचा इस्लाम प्रसार उत्तरेत युरोपात बंद झाला तो कायमचाच !
प्रेषिताने इस्लाम स्थापन करुन संपुर्ण अरब राष्ट्र एकसुत्रात गुंफले .त्यांत त्यांनी पुर्वी रानटी असणार्या या जमातीस अध्यात्माचा अर्थात श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी चा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु
लवकरच जेवा मंहमदाच्याच वंशाच्या खुरेश जातीच्या लोकांनी जेवा त्यास त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा मंहमदाने एक विलक्षण युक्ती योजिली ,
आज पर्यंत त्याने धर्मोपदेश शांततेत केला होता .मग त्याने एक फतवा काढला की
आजपर्यंत शांततेने व नम्रतेने धर्मोपदेश करण्यात आला परंतु लोक फार दुराग्रही ,
पुर्वीच्या पैगंबराने धर्मोपदेश बहुत केला ,परंतु तरी लोकांनी त्यांचे ऐकले नाही
म्हणुन मि आता तुम्हाला आदेश देतो की हा धर्म जे ऐकणार नाहीत त्यास तरवारीने जिंकावे
यश आल्यास शत्रुचे धन आपणास मिळेल हरल्यास स्वर्ग मिळेल
यामुळे मुसलमानांचा शांततेचा बाणा सुटुन लष्करी बाणा निर्माण झाला आणी बघता बघता पैगंबराच्या मृत्यु नंतर शंभर वर्षापर्यंत हा मुसलमानी झंझावात स्पेन पदाक्रांत करुन
पिरीनीज पर्वरांगा पार करुन फ्रान्स पर्यंत आला
ह्या झंझावाताच नेतृत्व डमास्कस स्थित उमईद घराण्याचा खलिफा नाव अब्दुल रहमान अल गफीक तीसरा या शुर पुरुषा कडे होते
ह्याने आपल्या नेतृत्वाखाली Toulouse आणी Garonne चे युद्ध जिंकले होते .
हे आक्रमण जेवा फ्रान्सवर आले तेवा
संबध युरोप आणी ख्रिस्ती जनता जागृत झाली ,
आस्तित्वावरील संकट उभे असता ,
चार्ल्स मार्केल (जन्म इ.स. 686 कार्यकाल ७१८ -४१) नेतृत्वाखाली आस्ट्रासिया,न्युस्ट्रिया,बर्गंडी,स्वाबिया,अँक्विटेन आणी लोंबार्ड राज्याच्या(इटली) च्या फौजा एकत्र करुन अरब आणी बर्बर मुसलमानांविरुद्ध क्रुसेड्स पुकारले गेले ज्यास इतीहास फ्रांक्स सैन्य संबोधते
फ्रांक्स सैन्यबल 15000-20000तर अरबी सैन्यबल काही 20 -25000 असे होते
काही अरबी स्रोतांनुसार 50000 आहे .
अरब सूत्रांच्या मते, फ्रँक मुस्लिम धर्माभिमान्यांना मारण्यासाठी आणी त्यांचे धैर्य कमी करण्यासाठी फ्रांक्स
त्यांच्या समोर डोंगराळ आणि झाडे असलेल्या भागतुन लढु लागले.ते चौकोनी व्युहरचनेच्या पद्धतीने अरबी सैन्याला अचानक वेढुन त्रस्त करु लागले
सात दिवसांपर्यंत, या दोन सैन्यांत किरकोळ चकमकी झाल्या होत्या. उमय्यादांनी आपल्या पूर्ण शक्तीची पराकाष्ठा करुन बघितली. 'अब्द-अल-राहमन,
एक शुर सेनापती असला तरीही तो निष्फळ ठरला होता कारण त्याला चार्ल्सनै आपल्या सैन्यावर लक्ष केंद्रित करण्याची आणि लढाईचे क्षेत्र निवडण्याची संधीच दिली नवती.
शिवाय, उमय्यादना मार्टेलच्या सैन्याची संख्या माहीती करणे अशक्य होते कारण चार्ल्सने झाडांना आणि जंगलांचा उपयोग त्यांच्या खऱ्या संख्या लपविण्याकरिता केला होता.
ही गनीमि काव्याचीच पद्धत !
Mozarabic क्रॉनिकल (754 इ.स.)म्हणते:
आणि युद्धाच्या धक्क्यामुळे उत्तरेकडील माणसे समुद्रासारखी हलवता येणार नाही अशी दिसत होती . ते एकमेकांच्या शेजारच्या बाजूने उभे होते अगदी अभेद्य बर्फाचे बांधकाम जणु आणि त्यांच्या तलवारीच्या मोठमोठ्याने वारानी त्यांनी अरबांना खाली आणले. आपल्या सेनापती भोवती गोळा होण्यास भाग पाडीले तेवा ऑस्ट्राशियन्सचे लोक त्यांच्यापुढे उभे होते. त्यांनी त्याना तलवारी खाली टाकण्यास भाग पाडीले .
चौरस फोडून उमय्यादच्या सैन्याने चार्ल्सला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या रहिवाश्यांनी त्यांना वेढले आणि वेढा तुटु दिला नाही. युद्ध अजूनही शांततेत होते-
फ्रॅन्किश इतिहास सांगतो-
उमय्याद सैन्यात हेरांमार्माफतर्फत अफवा पसरवली गेली
की फ्रॅंकिश तुकडी बॉरोदांपासुन घेतलेली लुट लुटणार !
उमायदादच्या काही सैनिकांनी एकाच वेळी युद्धाला सुरुवात केली आणि लूट सुरक्षित करण्यासाठी ते छावणीत परतले.
लढाईच्या मुस्लिम अहवालांनुसार,
दुसर्या दिवशी (फ्रॅन्किश माहीतीप्रमाणे लढायचा दिवस केवळ एक दिवस आहे), चार्ल्सने पाठवलेल्या फ्रँकच्या तुकडीनै शिविर आणि रसदीचा मार्ग (गुलाम व इतरांसह) लुटण्यास सुरुवात केली.
उमयाद बेस कॅम्पमध्ये अंदाधुंदी माजली होती तेव्हा
शक्य तितक्या गुलामांना मुक्त करण्यासाठी चार्ल्सने एक सैनिकी पथक पाठवले होते.
हे गुलाम सोडवण्यात यशस्वी झाले,
कारण उमय्यादच्या तळावर गेलेले बरेच सैनिक त्यांच्या छावणी त परत आले.
उर्वरित मुस्लिम दोन्ही इतिहास मान्य करतात की माघार थांबविण्याचा प्रयत्न करताना 'अब्द-अल-राहमन' त्यांच्या सभोवती फिरत गेले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला .
नंतर उर्वरित सेना नाश पावली

दुरदर्शी इंग्रज आणी छ. महाराजांचा दरारा !


दुरदर्शी इंग्रज आणी छ. महाराजांचा दरारा !

आग्र्याच्या भेटीत झालेल्या दगाबाजीतुन महाराज सुटले ही वार्ता सुरतेस गेली ,
जगासहीत इंग्रजदेखील आश्चर्य चकीत होते मगरीच्या जबड्यातुन बाहेर येण्याच कार्य हे ,
परंतु राजां पराक्रम थोर परंतु इंग्रज हा प्राणी स्वहीतरक्षणार्थ कसा दुरदर्शी आहे बघा
सुरतकरांनी ओळखल होते की दगाबाजीमुळे शिवाजी राजे चिडलेले असणार आणी पुरंदरच्या तहात स्वराज्याची आर्थिक स्थिती ही खालावली असणार म्हणुन हा राजा आता ही आर्थिक स्थिती वाढविण्यासाठी नक्कीच सुरतेवर हल्ला करतील
केवळ सुरतच नव्हे तर प्रत्येक वखारीला ही सावधगिरीची पत्रे गेलेली आहेत !

हा होता इंग्रजाना महाराजांचा दरारा !

बाजी©
omkarpandav.blogspot.com

Thursday, 4 May 2017

रायगडचा जगदिश्वरा जवळील शिलालेख

* पहिल्या श्लोकातील –
_______ हिदुंधर्माभिमानी शिवरायांनी श्रीगणेशाला केलेलं आद्यवंदन
______शिवरायांचा पदवीसह आलेला उल्लेख .
_________ शिवरायांचा पदवीसह आलेला नामनिर्देश
अन
__राजधानी रायगड वरील हिरोजी निर्मीत वास्तुंचा नामोल्लेख
_______ स्वतः वास्तुस्थापज्ञ हिरोजीचा ईंदुलकराचा उल्लेख .
…ह्या गोष्टी अत्यांतिक उपयुक्त आहेत .
_______त्या संस्कृत “नऊ ” जशा आहेत तशा अगोदर अभ्यासुयात .
!! श्रीगएपतेयेनमः !!
!!प्रासादोजगदीश्वरस्यजगतामानंददोनु
!! ज्ञात ! श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेःसिंहासनेतिष्ठतः
!! शाकेषएनवबाएभुमिगएनादानंदसूवत्सरे ज्योतिराजा !
मुहुर्तकिर्तीमहितेशुक्लेशसार्पेतिथो !! 1 !! वापीकुपतडागराजिरू
!! चिरंहर्म्येवनंवीथिकोस्तंभैःकुभिंगृहैनरेंद्रसदनैरभ्रंलिहै
!! र्मीहितेश्रीमद्रायगिरौगिरामविषयेहिराजिनानिर्मितो
!! यावच्चंद्रदिवाकरौ विलसत स्तावस्य मुज्रुंभतो !! 2 !!
( येथे ‘ण’ हे अक्षर ‘ए’ असे अन ‘भ’ हे अक्षर ‘श्र’ असे काढलेय .)
____ व्याकरणदृष्ट्या व शब्द न तोडला हा शिलालेख असा असायला हवा होता ..
… !! श्रीगणपतेय नमः !!
प्रासादो जगदिश्वरस्य जगतामानंद दोनुज्ञय !!
श्रीमच्छत्रपतेः शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः !!
नाके षण्णवबाणभूमि गणदानंद संवत्सरे !
ज्योती राजमुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेशसार्पे तिथौ !! 1 !!
वापी कूप तडाग राजिरूचिरै हर्म्ये वनै वीथिके !
स्तंभैः कुम्भिगृहै नरेन्द्रसदनैभ्रंलिहे र्मीहिते !!
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हिराजिना निर्मितो !
यावच्चंद्रदिवाकरौ विलसत स्तावत्स्यमुज्जृंभते !! 2 !!
____ हिंदुधर्माचे आद्यपुजनिय दैवत श्रीगणेशाला वंदन करून हा शिलालेख हिरोजीनीं
प्रारंभ केला आहे .
प्रथम श्लोकाचा अर्थ _____
तीन्ही जगताच्या लोकांना आनंद देणारा हा जगदिश्वराचा प्रासाद सिंहासनाधिश्वर श्रीमच्छत्रपति शिवाजीराजे यांच्या आज्ञेने शके 1596 आनंदनाम संवत्सरे शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आश्लेशा नक्षत्र असताना ह्या ज्योतिषशास्त्रातील राजमुहूर्तावर ऊभारला गेला आहे ……
_________ टीप :-
येथे ” शाके षण्नव बाणभूमि गणना ” याचा अर्थ ‘ षट् नव बाण भूमी गणना ‘ असा घेऊन – षट् = सहा , नव = नऊ , बाण = पाच , भूमी= 1 असे अंकाने अर्थ लावित जावे ..
आत्ता ___
संस्कृतमध्ये ‘ अकंनाम् वामतो गती ‘ म्हणजे हेच अंक ” 6951 ” असे न वाचता उलटे म्हणजे ” 1596 ” असे वाचावयाचे असतात .
____ ” शाके षण्नव बाणभूमी गणना ” म्हणजे शके 1596 होय …
तसेच ” शुक्लेश सार्पै तिथौ ” चा अर्थ असा आहे
_____ शुक्ल म्हणजे शुद्ध ईश = ब्रम्हा + विष्णु + महेश = 3. आणि सार्प्यै (सर्प ) =1.
म्हणूनच ” शुक्लैश सार्पै ” = 31 .
पुन्हा संस्कृतमध्ये अंक उलटे वाचावे लागतात म्हणून ” 31 ” हे “13 ” असे वाचावे .
अन “13 ” म्हणजे ‘ त्रयोदशी ‘ होय .
_____ म्हणजेच
( श्रीमन्महाराज शिवछत्रपती हे शालिवाहन शक 1596 आनंदनाम संवत्सर
जेष्ठ शुध्द त्रयोदशी ला सिहांसनाधिश्वर झाले ) .
आत्ता पुढील दुस-या श्लोकाचा अर्थ असा आहे :-
_____पाय-यांची विहीर , पाणी शेंदायचा आड , तलाव , रम्य व ने , राजरस्ते , स्तंभ , गजशाळा , अन राजांचा राजप्रासाद हे सर्व वाणीला अवर्णनीय अशा श्रीमदरायगडावर हीराजीनें निर्माण केला असुन,
तो यावच्चंद्र दिवाकर (चंद्र – सुर्य ) नभी आहेत तोपर्यंत ह्या पृथ्वीतलावर असेच तळपत राहो ..नांदत राहो .
# शब्दसूची __
वापी = पाय-यांची विहीर .
कूप = पाणी शेंदायचे आड .
तडाग = तळी – तलाव .
र्हम्यै = बगिचे .
विथीका = राजरस्ते .6
स्तंभैः = स्तंभ .
कुंभिगृहे = हत्तीशाळा .
नरेंद्रसदनै = राजांचा राजप्रासाद .
संदर्भ :
____1. दुर्गदुर्गेश्वर रायगड.
____2. रायगड स्थलदर्शन .

Sunday, 2 April 2017

महाराजांच्या मृत्युसंबधी

बखरी आणी महाराजांचा मृत्युसंबधी माहीती
महाराजांच्या मृत्यु समयी हजर सरदार ,हुजरे यांबाबत माहीती बखरी देतात
तर आता
सभासद बखरी प्रमाणे पाहु कोण कोण हजर होते,
कारभारी मंडल

.     निळोपंत मोरो पेशवे
   प्रल्हादपंत जनार्दनपंतांचे चिरंजीव
रामचंद्र निळकंठ
रावजी सोमनाथ
आबाजी महादेव
बाळाजी आवजी चिटणीस
जोतीराव
तर
सरदार लोक .
     हिरोजी फर्जंद
      बाजी कदम
बाबाजी घाटगे
मुधोजी सरखवास
सुर्याजी मालुसरे
महादजी नाईक पानसंबळ

ही खाशी माणसे
यात अण्णाजी दत्तो सुरनीस आणी मोरोपंत पेशव्यांच नाव कुठेच नाही कारण यावेळी ही मंडळी गडावर हजरच नव्हती
मग मारणार कसे
आणी सर्व बखरी हेच सांगतात कि महाराज ज्वराने निवर्तले !
मराठ्यांची बखर सांगते,
  गुडघी ह्या आजाराने महाराज पुढे ज्वरास बळी पडुन निवर्तले
तर
   ९१कलमी बखर
   याउपरी स्वामीस नवज्वर जाहला शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे चैत्र मासी पौर्णिमा दो प्रहरी  राजे स्वामीस कैलासवास जाहला
सभासद बखर
राजास व्यथा ज्वराची जाहली राजा पुण्यश्लोक कालज्ञान जाणे....
येणे प्रमाणे बखरींचा तपशील

बखरी ची विश्वासार्हता कमी असली तरी अगदीच टाकाऊ नसतात !!

बाजी©

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...