Saturday 4 February 2017

होळकर मिलर यांचा विवाह सोहळा आणी धर्मांतर !


टाईम्स अॉफ इंडीया 1फेब1928 च्या
अंकात नाशिकची जाने.30 ची
बातमी प्रसिध्द झाली.
त्यात मिस् मिलरच्या हिंदुकरणासंबंधी
चर्चा तसेच यास शंकराचार्यांची
याबद्दलची भुमिका याचा उल्लेख आला
आणी या बातमीनंतर जो वणवा पेटला
त्याने वर्षभर सर्व वर्तमानपत्राना
खाद्य पुरवले परंतु यामुळे तत्कालीन हिंदु
समाजाच्या जिवनात क्रांतीकारक
प्रसंग ठरला.त्याची हकीकत पण तशीच
रोमान्स आणी रोमांचक आहे
मिलर होळकर प्रेमसंबंध:-
इव्हीनिंग स्टँडर्ड (लंडन) येथुन प्रसिद्ध
झाल्याप्रमाणे तुकोजीराव तृतीय व
मिस् मिलर यांचा प्रथम परिचय
इ.स.१९२६ साली ल्युसर्न येथे झाला
तेवा तिचे वय 18 होते व तिने नुकतीच
शाळा सोडली होती .तीच्या
मागोमाग होळकर इंटरलेकन आणी पॕरिस
येथे गेले तिथै त्यांनी आपली इच्छा प्रकट
केली.मिस् मिलर यांच्या आईने जरी या
मागणीस उत्तेजन दिले नाही तरी
हिंदुस्थानातील राजा मुलीस
मागणी घालतो याचा आनंद वाटून
आपल्या घरी सीटल येथे
पाहुणचारासाठी बोलावले (मिलर
यांच्या सोन्याच्या खाणी असल्याचे
वर्णनही आहे )
महाराज अमेरिकेला गेले मिलर मँन्शन मधे
त्यांचे थाटात स्वागत झाले तिच्या
मैत्रिणी कडुन आंमंत्रणे आली आणी हे संबंध
घनिष्ठ होत गेले .
अभुतपुर्व घटना :-एक विदेशी विधर्मी
श्रीमंत सुशिक्षित महीला हिंदु
धर्मात प्रवेश करु इच्छीते ही घटनाच
अभुतपूर्व होती .आजपर्यंत बळानेछळाने
आमचे लाखोने धर्मांतर झाले पण कधी
त्याना मघारी पुन्हा स्वधर्मात घेतले
नाही परंतु आज यादोघांसाठी
शंकरचार्य डॉ.कुर्तकोटी यांनी प्रयत्न
करावेत हेच अभुतपुर्व!
गुंतागुंत:-हिंदुकरणाला प्रेमप्रकरणाची
पार्श्वभूमी असल्याने गुंतागुंत अधिक
वाढते.हा विवाह इतर
कायदेशीरमार्गाने होऊ शकत नाही
म्हणुन हिंदुकरणास मिस् मिलर तयार
झाली असा ही आक्षेप घेतला जातो .
त्यातच "संदेश" ने दि२-२-१९२८ तीन
तारा छापल्या त्यात एक अब्दुल्ला
कुरेशी यांची असुन यात म्हटले आहे कि
महाराजानी व मिस मिलर यानी
इस्लामचा स्विकार करावा .तोच धर्म
त्याच्या मनाला आत्म्याला शांती
देईल ........
वादंग :- या तारे मुळे गुंतागुंतीत अधिकच
भर पडली !
हिंदुधर्मातील राजास इच्छित
विवाह करता येत नाही म्हणुन दुसरा
धर्म स्विकारावा ही नामुष्की येऊ नये
म्हणुन
हिंदुकरणास सत्यशोधक,आर्यसमाज,तसेच
हिंदुधर्म मंडळाने पाठींबा दिला .
देशभरात वादंग उठले होते ,नाशिकला
तर ठिकठिकाणचे धर्ममार्तंड,पंडीत
गोळा हौऊन न भुतो न भविष्यती वाद
जाहले
आणी शेवटी संमती मिळाली
क्रमशः.......
यासाठी
१.अनंत विनायक चित्रे यांचे करविर
मठाधिपती शंकराचार्यास पत्र
२.मिस् मिलर यांचे धर्मपीठास पत्र
३.शंकराचार्याचे त्यास
प्रत्यात्तरादखल पत्र
४.महाराजा तुकोजीराव होळकरांचे
शंकराचार्यांस पत्र अभ्यासावेत!

बाजीराव पांडव ©

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...