Sunday 30 June 2019

जीवनवाटेवर 2

पुर्ण वाचा !

जिवनवाटेवर मला , मेघ भेटतात !
उरात फक्त पाणी घेऊन फिरणारे,
ज्याना आपल कुट्टपणे भरलेल दुःख असतं, समुद्रापासन विलग होण्याचं , हवेचा झोक नेईन तिथे भटकण्याचं !
आयुष्यात असतो एकटेपण ,ना नशिबी स्थिरता ,
परंतु तरीही हे मेघ बरसने सोडत नाहीत
,वसुंधरेस आपल्या सरीनी भिजविने कि जगास फुलविने सोडत नाहीत
पुर्ण पणे बरसताना आपलं आस्तित्व ही उधळुन टाकतात जगावरं ,आणि खुलवितात त्यांच जीवनं
या सगळ्या दिशाहिन जीवनप्रवासात आपलं आस्तीत्व सतत बदलुन ही ते आपल ध्येय मात्र विसरत नाहीत अनेक ओहोळांद्वारे कुठेतरी नदीत एकत्र होऊन समुद्रास मिळतातच ,
आपल्या जीवनात ही असेच असावे नाही का ?
आयुष्याच्या वाटेवर आपण कितीही भरकटलो  ,कितीही जबाबदार्यांच्या ओझ्याखाली झुकून मार्गहिनपणे भटकताना जरी आपलं आस्तित्व हरवलो तरीही अंतःकरणाच्या एका कोन्यात आपली ध्येयज्योती कायम हातांचा कोनाडा करुन राखावी अन योग वेळ येताच त्या ध्येयप्राप्तीत जिद्द बनोन रस्ता प्रकाशावी ,काही मार्ग चुकले म्हणजे ध्येय गाठता येत नाही हे पुर्ण सत्य नाहीच हे ,मेघांच ऐकुन आयुष्य वाट मि चालु लागतो ..

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...