Thursday 29 June 2017

ये परतुनी भाग आठवा

अवघड होता ग....
.....तो क्षण   
ज्यावेळी नातं तुटलं हा विचार मनात आला !
    अचानक जोरदार वारा गरगर सुन्नननननन अवाज करत मस्तिष्कात फिरु लागला
हातातील रक्तवाहीन्यांत भुकंप उद्रेक पावत होता
त्याच्या भयानक लहरींनी हात पाय थरथर  कापत होते.....
     शरिराची उष्णता प्रलयकाळा सारखी अंगास तापवु लागली...
आत ही बाहेरही ,
सगळं रानं पेटलं होतं  मनामधे च नव्हे तर बाहेर ही
शरिरातील सगळी शक्ती अकल्पीत शुन्यात विरली
,कळेचना
हे सर्व भावना वेग अंतकरणाच्या पृष्ठभागाला धडाधड धक्के देऊ लागले
आणी भावनांच्या ज्वालामुखी चा उद्रेक कंठातुन आणी डोळ्यातुन बाहेर येऊ लागला .
मि हमसुन हमसुन रडलो ,
       तु सहज म्हटलीस ,
तुला मिळेल दुसरी माझ्याहुन छान अशी ,परंतु

.... प्रत्येक खोल जखम काळाने बरी जरी होत असली तरी
  व्रण जाचत राहतोच
  आयुष्यभरासाठी ...
तो सोबतच राहतो ,
       दहशत बसवायला की पुन्हा ही चुक करु नको ,
हे मन ,
    ह्या जागेवर झालेली जखम सहन करायला समर्थ नाहीय
         आणी पुन्हा कुणावर प्रेम करायला हिम्मत ही करणार नाहीय !
कारण
   भुतकाळाता झालेले आघात !
      ह्या भयानक आघाताने ते अगदीच दुर्बल झालयं  
आघात सहन करुन शिणलेलं वरुन भक्कम वाटत असेलही परंतु
आतुन
    कमकुवतं !
जुन्या किल्याच्या तटाप्रमाणे !
        या विचारात मि मुर्छित कसा झालो कळलंच नाही !

बाजी
जीवन अर्घ्य
ये परतुनी भाग आठवा



No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...