चालताना होत नाही भास आता
पाहताना रोखतो ना श्वास आता
सोडताना हात येथे हृदयाला
वाटतोना कोणताही त्रास आता
तोडताना पाहतो मी रोज येथे
येत नाही या फुलाना वास आता
सांजवेळी येत होतो ती दिसेना
लागली का या मनाला आस आता
चालताना होत नाही भास आता
पाहताना रोखतो ना श्वास आता
सोडताना हात येथे हृदयाला
वाटतोना कोणताही त्रास आता
तोडताना पाहतो मी रोज येथे
येत नाही या फुलाना वास आता
सांजवेळी येत होतो ती दिसेना
लागली का या मनाला आस आता
उग्रवीर क्रुद्धमहा तांडवात रुद्रजणू,
चपलचपलेहून प्रचंड शूल जणू
घनन् घनघोर चतुरंग भूप छत्रपती
खड्ग विखंडकारी म्लेंछ अरि सह्यपती
मेरुहुन उंच गढ उंच गढकोट पती
श्रीमंत श्री महादानी पुण्यशील श्रीपती
इंद्रही न चंद्रही प्रभावशाली सुर्य जणू
राजा शिवछत्रपती वैराग्यनृप जणू
वृत्त मंजुघोषा
डाव येथे खेळताना हारलो होतो
मी सुखाला शोधताना हारलो होतो
साथ नाही चालतो मी एकटा वेडा
श्वास येथे चालताना हारलो होतो
उत्तरे मी शोधलेली सर्वची येथे
शांत येथे झोपताना हारलो होतो
युद्ध मोठे भावनांनी, छेडले जेव्हा
आसवे मी रोखताना, हारलो होतो
काय माझे शब्द मजला पारखे झाले
भाव येथे बोलताना ,हारलो होतो
चाले वीर दणदण बोले शिव हर हर घुमे वारा भिर भिर शिवसैन्य चालते
घुमत घुमत घोर नगारे रणशिंग घोर लढण्यास अधीर शिवसैन्य चालते
यम यम भिववुन पळते यवनसेना मारण्यास क्रुद्धमहा शिवसैन्य चालते
रक्त रक्त लोटलेले महा पाट वाहीलेले रुधीरात नाहलेले शिवसैन्य चालते
डोळ्यांचे बनोनी घन
कित्येक बरसल्या राती
उगाच होते बरसने ते
कोणा परक्यांसाठी
पाचोळ्यागत उडाल्या
मनशिशिरातुन भावना
उगाच फुलल्या होत्या
कुणा आगंतुकासाठी
गढूळ झाला होता
विचारप्रवाह मनाचा
का उगा थांबला होता
संकुचित डबक्यापाशी
तुटले बांध धैर्याचे
मन तुटलेले जेव्हा
मिच होतो माझा,
ना कोणी सावरण्यासाठी
भावनांचे विचित्र असे ओझे घेऊन
एकटेच जीवनवाटेवर चालताना वाटेत उंच पर्वत आणि खोल अश्या दर्या भेटतात ,काळे कभीन्न खडे कातळ आणि शिला,या कातळांची शिलांचीही एक सुंदरता असते ,एरवी लोकाना गिरीकंदराची ओढ पाऊस पडल्यावर वाटत असेल ही पण ,ती हिरवळ अंगावर घेऊन नटण्यासाठी सहा महीने तरी उनवार्याशी आणि एकटेपणाशी या मंदराना झुंजावे लागतेच न तेव्हा या पर्वताला सोबती असतात ह्याच रानशिला
मग पाऊस येतो ,सर्व पर्वतराजी खुलून दिसु लागते आणि लोकांसोबत प्राण्यानाही ओढ पर्वतराजींची लागते ...
अशा प्रसिद्धीच्या काळातही ना पर्वत शिलाखंडांची ना शिलाखंड पर्वताची साथ सोडतात या उलट नवागताना आधार बनतात कारण दोघाना माहीती असते सुगीचे दिवस गेल्यावर
एकटेपणा आहेच !
उत्कर्षाच्या काळात पर्वत उतत नाही की शिलाखंड मातत नाही
आपल्या ही आयुष्यात काही लोक असेच असतात..नाही का ..
बाजी
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...