अंकासोबत
जीवनानाट्यात पात्र बदलत गेले
नट तोच राहीला मंच बदलत गेले
काळासोबत
जीवनप्रवाहात रंग बदलत गेले
पक्षी तोच राहीला,पंख बदलत गेले
दिशेंसोबत,
जीवनकालात वारे बदलत गेले
ऋतु तोच राहीला दिन बदलत गेले
बाजी
अंकासोबत
जीवनानाट्यात पात्र बदलत गेले
नट तोच राहीला मंच बदलत गेले
काळासोबत
जीवनप्रवाहात रंग बदलत गेले
पक्षी तोच राहीला,पंख बदलत गेले
दिशेंसोबत,
जीवनकालात वारे बदलत गेले
ऋतु तोच राहीला दिन बदलत गेले
बाजी
पापण्यावर घेऊन पहाटस्वप्ने मनपाती धुंद होती
झाली भेट दवबिंदुंची पण
पहाट सरली होती
दो क्षणांच्या सोबतीची आस ,तरीच
पाती रात्रभर जागीच होती
बाजी
तुला वहायच अगदी न थांबता ,
ते सर्व जे तुझ्यावर अवलंबुन आहेत त्यांकरिता
तुला स्वःतच आस्तित्व अदृश्य करुन
कर्म करायचय दुसर्यांसाठी,
श्वास भरायचाय त्यांच्या जीवनात
म्हणुन
तुला शोकगीते गात एका जागी थांबण्याचा अधिकार नाही
त्या वार्याकडनं शिक काही...!
बाजी©
गाव जेव्हा दिसु लागले रात्र केव्हाच सरली होती
स्वप्नगावीच्या शोधात काट्यांचीच सोबत होती
पोचता कळावे गाव तेच पण उशीर झाला होता
रात्रभरात गाव लूटुन आज विधुर झाला होता
चाचपडत काढलेल्या रस्त्यावर फुलेच बस्स उरली होती
खुडलेली काटीही माझ्या मनास मोठा आधार वाटत होती
दाटल्या अंधारात लख्खपणे सगळा गाव जळत होता
उरात घेऊन पाणी मधेच तलाव मात्र हसत होता
होते पाणी जरी कोणी विझविण्यास आले नाही
जळालेल्या जखमेवर कोणी फुंकर साधी घातली नाही
काल सकाळी हा गाव ज्याना आपलं म्हणत होता
दुसर्या पहाटे जळाल्यावर,त्याना गाव सोडताना पाहत होता
न हे नयन राधा राणी कृष्ण मेघ श्रावणीचे
हाती हे तुझे शशीवदन की फुल पंकजाचे
सावलीत लपाव्यात वेली असा केशसंभार
हा तनुगंध की कस्तुरीचा ग धुंदवितो फार
कोण तु अन् कोण मि
सवाल इथे हा नाही
आहोत का आपण एथे
कळतय का तुला काही
हातपाय आणि बुद्धी
आहेत इथे सर्वाना
जन्मामागिल कारण
तुझ्या विचार मनाला
पोट भरतोच आपण
रोज खाऊन दोन घास
यामधे कारण शोध
आयुष्य तरी काय ,दोन श्वास ?
आयुष्य नावाच माझ स्वप्नं
अर्धवटच राहील आहे
पहाट होण्या आधीच भंगुन
सगळं काही उजाडलं आहे
फुलपाखराच्या कोशासारखी
माझीही काही स्वप्न होती
वेगळी काहीच नाही हो
ति तुमच्याच सारखी होती
सावरुन स्वतःस पुन्हा मि
स्वप्न मनात धरली होती
माझ्याच लोकांनी त्याची लक्तरे
वेशीवरती टांगली होती
सोडुन त्या नराधमाना
प्रत्येक प्रश्न उठला माझ्यावर
लांछनाचा विषप्रयोग झाला
नकळत माझ्या मनावर
निघाली अंत्ययात्रा माझी जेव्हा
सर्वजण रडत होते
वेळ गेल्यावर आज सगळे
माझी किंमत समजत होते
बलात्कार केला राक्षसानी
परंतु समाज तो पिशाच्च ठरला
त्यानी फक्त शरिर लुटले
समाजाने तर खुन केला
पुरुषार्थाचे भाट सारे
आज लाजेने चुर झाले
रक्षिणारे हात जेव्हा
भक्षण्यास कामी आले
पुरुषार्थाचे गोडवे गाण्या
आता चांदभाट होणार नाही
स्त्रीलज्जा रक्षिणारे वीर
प्रताप शिवाजी होणार नाहीत
कारण
पुढारलेला समाज आजचा
विचाराने पांगळा आहे
21व्या शतकात राहुन
अवयवात अब्रु शोधत आहे
समाजमन गढूळ असल्यावर
मनाची पवित्रता कोण समजणार
आणी म्हणुनच
शरिर अत्याचाराच बळी ठरल्यावर
दोषी देखील मिच ठरणार.
बाजी©
omkarpandav.blogspot.com
प्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...