Tuesday, 16 April 2019

नाट्यजीवन

अंकासोबत
जीवनानाट्यात  पात्र बदलत गेले
नट तोच राहीला मंच बदलत गेले

काळासोबत
जीवनप्रवाहात  रंग बदलत गेले
पक्षी तोच राहीला,पंख बदलत गेले

दिशेंसोबत,
जीवनकालात वारे बदलत गेले
ऋतु तोच राहीला दिन बदलत गेले

बाजी

Tuesday, 9 April 2019

पापण्यावर पहाटस्वप्ने

पापण्यावर घेऊन पहाटस्वप्ने मनपाती धुंद होती
झाली भेट दवबिंदुंची पण
पहाट सरली होती
दो क्षणांच्या सोबतीची आस ,तरीच
पाती रात्रभर जागीच होती

बाजी

Monday, 8 April 2019

वार्याकडन शिक

तुला वहायच अगदी न थांबता ,
ते सर्व जे तुझ्यावर  अवलंबुन आहेत त्यांकरिता
तुला स्वःतच आस्तित्व अदृश्य करुन
कर्म करायचय दुसर्यांसाठी,
श्वास भरायचाय त्यांच्या जीवनात
म्हणुन
तुला शोकगीते गात एका जागी थांबण्याचा अधिकार नाही
त्या वार्याकडनं शिक काही...!
बाजी©

Sunday, 7 April 2019

जेव्हा गाव दिसु लागला

गाव जेव्हा दिसु लागले रात्र केव्हाच सरली होती
स्वप्नगावीच्या शोधात  काट्यांचीच सोबत होती

पोचता कळावे गाव तेच पण उशीर झाला होता
रात्रभरात  गाव लूटुन आज विधुर झाला होता

चाचपडत काढलेल्या रस्त्यावर फुलेच बस्स उरली होती
खुडलेली काटीही माझ्या मनास मोठा आधार वाटत होती

दाटल्या अंधारात लख्खपणे सगळा गाव जळत होता
उरात घेऊन पाणी मधेच तलाव मात्र हसत होता

होते पाणी जरी कोणी विझविण्यास आले नाही
जळालेल्या जखमेवर कोणी फुंकर साधी घातली नाही

काल सकाळी हा गाव ज्याना आपलं म्हणत होता
दुसर्या पहाटे जळाल्यावर,त्याना गाव सोडताना पाहत होता

Wednesday, 16 January 2019

न हे नयन राधा

न हे नयन राधा राणी कृष्ण मेघ श्रावणीचे
हाती हे तुझे शशीवदन की फुल पंकजाचे
सावलीत लपाव्यात वेली असा केशसंभार
हा तनुगंध की कस्तुरीचा ग धुंदवितो फार

Sunday, 6 January 2019

कोण तु

कोण तु अन् कोण मि
सवाल इथे हा नाही
आहोत का आपण एथे
कळतय का तुला काही

हातपाय आणि बुद्धी
आहेत इथे सर्वाना
जन्मामागिल कारण
तुझ्या विचार मनाला

पोट भरतोच आपण
रोज खाऊन दोन घास
यामधे कारण शोध
आयुष्य तरी काय ,दोन श्वास ?

Thursday, 3 January 2019

पिडीतेच मनोगत

आयुष्य नावाच माझ स्वप्नं
अर्धवटच राहील आहे
पहाट होण्या आधीच भंगुन
सगळं काही उजाडलं आहे

फुलपाखराच्या कोशासारखी
माझीही काही स्वप्न होती
वेगळी काहीच नाही हो
ति तुमच्याच सारखी होती

सावरुन स्वतःस पुन्हा मि
स्वप्न मनात धरली होती
माझ्याच लोकांनी त्याची लक्तरे
वेशीवरती टांगली होती

सोडुन त्या नराधमाना
प्रत्येक प्रश्न उठला  माझ्यावर
लांछनाचा विषप्रयोग झाला
नकळत माझ्या मनावर

निघाली अंत्ययात्रा माझी जेव्हा
सर्वजण रडत होते
वेळ गेल्यावर आज सगळे
माझी किंमत समजत होते

बलात्कार केला राक्षसानी
परंतु समाज तो पिशाच्च ठरला
त्यानी फक्त शरिर लुटले
समाजाने तर खुन केला

पुरुषार्थाचे भाट सारे
आज लाजेने चुर झाले
रक्षिणारे हात जेव्हा
भक्षण्यास कामी आले

पुरुषार्थाचे गोडवे गाण्या
आता चांदभाट होणार नाही
स्त्रीलज्जा रक्षिणारे वीर
प्रताप शिवाजी होणार नाहीत

कारण

पुढारलेला समाज आजचा
विचाराने पांगळा आहे
21व्या शतकात राहुन
अवयवात अब्रु शोधत आहे

समाजमन गढूळ असल्यावर
मनाची पवित्रता कोण समजणार
आणी म्हणुनच
शरिर अत्याचाराच बळी ठरल्यावर
दोषी देखील मिच ठरणार.

बाजी©
omkarpandav.blogspot.com

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...