Sunday, 31 December 2017

पुस्तके :जुन्या मित्राची पुन्हा भेट.

पुस्तके ..जुना मित्राची पुन्हा भेट !

या विषयावर कविता करावी तरी उत्तमच होते परंतु काही गोष्टी अल्प शब्दात मांडाव्या इतक्या लवचिक खास नसतात .
डिसेंबर उजाडला की आंग्ल नववर्षाची चाहुल लागते,मनाला आपोआप कसलीशी हुरहुर लागते ,
गत वर्षातील आठवणींचे पट हळुहळु ओळीने डोळ्यासमोर तरळु लागतात
या आठवणींच्या निमित्ताने एकएक माणसे आठवु लागतात,आठवतात काही गतवर्षीस केलेले संकल्प ,ते पुर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न .
नविन संकल्प मनी बांधण्यासाठी वेळ मिळतो स्वतःच्या मनाच्या कानाकोपर्यात फिरण्यासाठी ,स्वतःच्याच मालकीच्या संपत्तीच मुल्यमापन करण्यासाठी ,
मन काय आहे हे भौतिकतेच्या पातळीवर जरी ज्ञात नसले तरी ,केवळ कल्पना करुन  तरी त्या मनाच्या भुतकाळ नामक कप्यात साठविलेल्या अनेक आठवणी ,घटना आणी सवयी यांच मुल्यमापन करु लागतो आणी ते ही एका वेगळ्या दृष्टीकोणातुन ,
  अशाचप्रकारांती आज एका दुरावलेल्या मित्राशी मैत्री पुन्हा वाढवावी
असा संकल्प मनी धरिला ,
दुरावलेला म्हणजे इयत्ता दहावी पर्यंत जी  मित्र म्हणुन होती ती ही पुस्तके फक्त ,
त्यांच्यासोबत बालपण संपुन किशोरावस्थेत कधी पोचलो याचा गंधच  लागला नाही ,खुप काही आठवणी या पुस्तकांसोबत आहेत
काही गोष्टींप्रती प्रेम त्यासाठी विरोध झाल्यावर वाढते तसच माझं झालं .
मी इ.पाचवी ते दहावी गावी योग्य शिक्षणाभावी  आत्या-मामा कडे पाथर्डीस होतो .
या पुस्तकासोबतच नातं वाढण्यास आमच्या आत्याबाई पुर्णतः कारणीभुत आहेत तसं त्याना शालाबाह्य पुस्तकवाचन जमत नसे  ,त्यांच्या या वागण्यास कारणही योग्य होते ,आजही ग्रंथालयाची बरीच पुस्तके माळ्यावर तेव्हा फेकली ती अजुन आहेत ,ती फेकली कारण माझ अभ्यासाकडे होत असलेल दुर्लक्ष ! या गोष्टीमुळे मी अभ्यास आणी वाचन
दोन्ही गोष्टींचा ताळमेळ जमविण्यास शिकलो ,
नंतर पुस्तकात पुस्तक घालुन वाचावयाचो ,ही गोष्ट आत्यास माहीती होती  हे मला आता गेल्यावर त्यानीच सांगितली ,
ती माळ्यावरची पुस्तके मी पुन्हा पाहीली आणी त्या जीर्ण पानांवरुन हात फिरवितानि मला जुना मित्र सापडल्याचा आनंद झाला ,
लहानपणी काही गोष्टीच वेड वेगळच असते नं ,काही कळत नसताना ही
मी गलेलठ्ठ कादंबर्या आणी पचावयास अवघड अश्या विचारी लेखकास वाचले ,त्यांच्याशी  मैत्री केली ,
  सुरुवात साने गुरुजींपासुन ते सावरकर -होमर पर्यंत .
आणी पाऊलखुणा ,पानीपत,मृत्युंजय पासुन मराठी, मुसलमानी रियासत  पर्यंत इ.नववीपर्यंत
वाचले ,
आणी दहावी वर्ष शनी च्या साडेसातीस घेऊन आले,ह्यास मी शापीत म्हणेन कारण हे वर्ष सुरु झाले आणी माझा मित्र कुठेतरी मजपासुन दुरावला ,
स्पर्धेच्या गर्दीत हरवला , तसा तो pdf रुपात कायम सोबत होता परंतु
या त्याच्या नव्या रुपात त्यास स्विकारण्यास त्याची सवय होण्यास वेळ गेला
आता पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षा त्याची जाणीव जास्त तीव्र झाली कुठेतरी वाटलं ,परतावे स्वतःकडे स्वतःच्या नैसर्गिक स्वभावाकडे
म्हणुन नववर्षाचा संकल्प मनी बांधिला ,हा मित्र पुन्हा जवळ केला .

बाजी©

Friday, 29 December 2017

काव्य

काव्य सुचण्या करिता मन जीवंत असावे लागते
त्यात उत्कटता येण्यासाठी  दुःख सोसावे लागते
प्रकट होण्याकरिता धडधड असावी हृदयी,
त्यास धडकण्याचे कारण कोणीतरी असतेच
 

चढण

लोक उंच टेकडीसारखे असतात
ते सहसा वर चढु देत नाहीत
आपल्याला खुप जास्त प्रयत्न करावा लागतो
आणी जेव्हा तुम्ही सर्वास पार करुन
वर पोचताल
ते तुम्हाला डोक्यावर घेतील मग तुम्ही एक पाउल चालले तरी दहा पाउलाच अंतर कापलेल दिसेल परंतु हे सगळं होण्याआधी
दहापाउलाएवढा जड पाउल टाकावा लागतो ,तिथे पोचाव लागतं

Tuesday, 26 December 2017

पैलतीर

सुवर्णवेळ सायंकाळची
               वाटते तिने सरुच नये
हरवुन स्वत्व पाहताना
              वाटते सुर्या तु बुडुच नये
निरव शांतता ऐसी हवेत
              वाटते येथुन उठोच नये
विसरतो संघर्षव्यथा पैलतीरी
                वाटते परतुच नये ,

Thursday, 26 October 2017

सुर्य नभीचा

एकटा राहीलो इथे,
आपले कुणी दिसेना
नभांतरीसुर्यासम
सोबती कुणी असेना

वाटा त्रासिणार्या
खणोन आज रोधिल्या
सावल्या भेडिणार्या
जाळोन राख केल्या

दिवास्वप्ने मनीची
छाटुन संपविली
नाती जळमटांची
काढुन फेकीयली

आता

जाळोनी अंग स्वतःचे
तेज जगा द्यावयचे
स्वःतेजाने आपुल्या
नंभांबर प्रकाशावयाचे
बाजी©

Sunday, 22 October 2017

अज्ञात रणरागिणींच्या शोधात १..रणचंडी झलकारी बाई.....


जब तक झाँसी स्वतंत्र ना करु,
न शृंगार करुंगी न सिंदुर लगाउंगी
अशी शपथ घेणारी तेजस्वी शलाका १८५७ च्या स्वतंत्र्ययुद्धात आपली चमक सोडुन गेली ज्या चमकेने सबंध पाश्चात्त्यांचे डोळे तेजाने दिपुन गेले ती झांशीच्या महालक्ष्मी ची सखी रणचंडी झलकारी बाई !
झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईंच्या दुर्गा या स्त्री दलाची सेनापती !
प्रखर निष्ठा आणी मुर्तीमंत शौर्य उपजत घेऊन आलेली युद्धशलाका .
झलकारीबाईंचा जन्म २०नोवेंबर १८३० रोजी भोज या झाशी नगराच्या वायव्येस स्थित छोट्याशा गावात झाला .
वडीलांचे नाव मुलचंद  तर आईचे धनिया असे होते. त्या कोरी या समाजातील होत्या . त्या आईवडीलांच्या एकुलती एक संतान .वर्णाने सावळ्या परंतु रुपाने सुंदर अशी ही कन्या जन्मतः शुर होती कारण
भोज हे खेडे जंगलकिनारी असल्याने गावकर्याना हिंस्र पशु व लुटेरुंच्या टोळ्याना सतत तोंड द्यावे लागत असत.म्हणुन सर्व लोक शस्त्र निपुन होते.
झलकारीबाईं चे वडील झाशी संस्थानात सैनिक होते ते उत्तम तीरंदाज ही होते.आई देखील तशी शुर होती ,उभय दांपत्य हे धार्मिक वृत्तीचे म्हणुन हाच गुण झलकारीबाईंमध्ये देखील उतरला होता .
त्याचप्रमाणे मुलचंदने आपल्या मुलीस युद्धकलेचे  संपुर्ण ज्ञान दिले होते .
तिच्या शौर्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात
त्यातीलच एक अशी की,
एके दिवशी झलकारीबाई गुरे घेऊन रानात गेली असता तिच्यावर चित्याने अचानक झडप घातली
तेव्हा धैर्यवान मुली बाजुला उडी मारुन स्वतःचा बचाव केला आणी हातातील लाठीने चित्याच्या नाकाजवळी वर्मावर असा प्रहार केला
की चित्ता जागेवरच निपचित होऊन पडला .नंतर तिने त्याला लाठीने इतक मारल की तो त्यातच मेला .
या कृत्याची सगळीकडे प्रशंसा केली गेली
तिच्या शौर्यगाथेतील एका घटनेत तिने गावच्या मुखियाच्या घरावर रात्री दरोडा घालण्यास आलेल्या दरोडेखोराला लाठीनेच बदडले होते आणी नंतर मुखियाने तिला आपली मुलगीच मानली .त्यानंतर तिची सगळीकडे प्रशंसा झाली .
नंतर झलकारीबाई वयात आल्या नंतर पुरणचंद ह्या झाशीसंस्थानात तोफखान्यावरील गोलंदाजाशी तिचे लग्न लावले गेले लग्नात मुखियाने गावभोजन दिले
आणी लग्नानंतर उभय दांपत्य झाशीस राजाराणीचा आशीर्वाद घेण्यास महालात गेले आणी इथे दोन दुर्गा प्रथमच एकमेकीना भेटल्या झलकारीबाई तील तडफ राणी लक्ष्मीबाईंनी हेरली आणी आपल्याच पदरी नोकरीस ठेवुन घेतले
इथेच एका अध्यायाची अथश्री झाली

राणीने सह्स्रचंडी याग करण्याचे काम झलकारीस दिले तो चंडीयाग होता
दुर्गादल स्थापिण्याचा आणी प्रमुख होती प्रत्यक्ष रणदुर्गा झलकारीबाई .
पुढे सन १८५७ उगवले .क्रांतीचे संवत्सर हे
सकल हिंदुस्थान बळावले फिरंग्यांविरुद्ध .
झाशीच्या किल्यावरुन महालक्ष्मी क्रुद्ध होऊन कडाडली
मेरी झासी नही दुंगी !
आणी
सहस्त्रचंडी यागाच्या ज्वाळेतुन निघालेल्या ज्वालाप्रमाणे सहस्र दुर्गा सहस्त्र भैरव झाशी च्या किल्यावर लढण्यास सिद्ध झाले .
23मार्च१८५८ सर ह्युजच्या नेतृत्वाखाली इंग्रजी तोफा गडावर आग ओकु लागल्या .
रण तुंबळ माजले .
खाशी राणी लक्ष्मीबाईंनी पुरुषी वेशात शत्रुसैन्यात घुसुन धडक मारली नंतर परत किल्यात येत्या झाल्या .
झलकारी विजेसारखी लढत होती फिरंगी कापत होती
गुप्तहेरांचे जाळे व बातम्या अचुक पोचवत  होती .
आणी घात झाला .
हिंदुस्थानचा अभिशाप फळास आला .फितुरी झाली. शत्रु किल्यात घुसू लागला .
झलकारीबाईनी दुलाजी ठाकुराची फितुरी राणीच्या कानी घातली
राणीने शेवटची बैठक घेतली ,खाशी मंडळी होती अंती झलकारीबाई बोलल्या
राणीचा वेश चढवुन मी किल्ला लढवावा .राणीने खाशा लोकांसहीत येथुन सुरक्षीत जागी जावे .आणी क्रांती कायम राखावी
जोपर्यंत झाशी स्वतंत्र होत नाही
ना मी शृंगार करेन नाही सिंदुर लावेल
हे जीवन स्वतंत्र्यासाठी .
राणी गहीवरलि परंतु रात्र वैर्याची समय असा अवघड पडलेला भावनांसाठी वेळ नव्हता राणी लक्ष्मीबाईंनी किल्ला सोडला परंतु महालक्ष्मी नसली तरी महाकाली अजुन किल्ल्याच्या तटावर अजुन होती
शेवट पर्यंत लढत राहुन शेवटी पकडली गेली .दुलाजीच्या माणसानी तिला ओळखले होते
लगेच तिने त्याच्यावर गोळी झाडली ,घोडा हलला आणी गोळी इंग्रज सैनिकास लागली या घटनेने ह्युज चिडला .
त्याने तिला कैद करुन पहार्यात ठेवले परंतु पिंजऱ्यात राहील ती वाघिण कसली
तीने पहार्यातुन सुटका करुन किल्याकडे पळ काढला
सकाळी ह्युज किल्यावरचे दृश्य पाहुन अवाक झाला .ते दांपत्य
पुरणचंद आणी झलकारीबाई तोफ लावत होते .
झटकन ह्युजने इशारा केला एक गोळी आली आणी पुरणचंद च्या छातीत लागली तो जागेवर गतप्राण झाला परंतु तरीही झलकारीबाई नी तोफ उडवली त्यात बरेच इंग्रज मेले  अंती एका इंग्रजी तोफगोळा लागुन तिच्यादेहाचे तुकडे आणी रक्ताचा अभिषेक तिथेच किल्यावर झाला क्रांतीची विज भयंकर कडकडाट करुन अनंतात विलीन झाली .

बाजी©

Monday, 25 September 2017

पिडीतेच मनोगत

पिडीतेच मनोगत

निघाली अंत्ययात्रा माझी
सर्वजण रडत होते
वेळ गेल्यावर आज सगळे
माझी किंमत समजत

बलात्कार केला राक्षसानी
परंतु समाज तो पिशाच्च ठरला
त्यानी फक्त शरिर लुटले
समाजाने तर खुन केला

पुरुषार्थाचे भाट सारे
आज लाजेने चुर झाले
रक्षिणारे हात जेव्हा
भक्षण्यास कामी आले
पुरुषार्थाचे गोडवे गाण्या
आता चांदभाट होणार नाही
स्त्रीलज्जा रक्षिणारे
प्रताप शिवाजी होणार नाहीत
कारण
पुढारलेला समाज आजचा
विचाराने पांगळा आहे
21व्या शतकात राहुन
अवयवात आब्रु शोधत आहे

समाजमन गढूळ असल्यावर
मनाची पवित्रत कोणाला समजणार
आणी म्हणुन
शरिर अत्याचाराच बळी ठरल्यावर
दोषी देखील मिच ठरणार.

बाजी©
omkarpandav.blogspot.com

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...