Monday 8 May 2017

टुर्सची लढाई आणी युरोपचे बदलेले भविष्य

टुर्स ची लढाई आणी युरोपचे भविष्य !
युद्ध म्हणजे संघर्ष
मग तो प्रत्येक जीवास जगण्यासाठी करावाच लागतो ,कारण तो स्वतःच आस्तीत्व टिकवण्याचा त्याचा प्रयत्न असतो
काही युद्धे ही अशीच निर्णायक असतात ती खुप भीषण नसली तरी परिणाम दुरागामी सोडतात ज्यामुळे जगाचे भविष्य बदलते
अश्या युद्धांमधे
टुर्स च्या युद्धाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण ह्या युद्धाचे परिणाम आजही आपल्याला दिसता ते ख्रिस्ती धर्माच्या युरोपातील अबाधीत आस्तीत्व स्वरुपात
ह्यामुळे अरबांचा इस्लाम प्रसार उत्तरेत युरोपात बंद झाला तो कायमचाच !
प्रेषिताने इस्लाम स्थापन करुन संपुर्ण अरब राष्ट्र एकसुत्रात गुंफले .त्यांत त्यांनी पुर्वी रानटी असणार्या या जमातीस अध्यात्माचा अर्थात श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी चा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु
लवकरच जेवा मंहमदाच्याच वंशाच्या खुरेश जातीच्या लोकांनी जेवा त्यास त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा मंहमदाने एक विलक्षण युक्ती योजिली ,
आज पर्यंत त्याने धर्मोपदेश शांततेत केला होता .मग त्याने एक फतवा काढला की
आजपर्यंत शांततेने व नम्रतेने धर्मोपदेश करण्यात आला परंतु लोक फार दुराग्रही ,
पुर्वीच्या पैगंबराने धर्मोपदेश बहुत केला ,परंतु तरी लोकांनी त्यांचे ऐकले नाही
म्हणुन मि आता तुम्हाला आदेश देतो की हा धर्म जे ऐकणार नाहीत त्यास तरवारीने जिंकावे
यश आल्यास शत्रुचे धन आपणास मिळेल हरल्यास स्वर्ग मिळेल
यामुळे मुसलमानांचा शांततेचा बाणा सुटुन लष्करी बाणा निर्माण झाला आणी बघता बघता पैगंबराच्या मृत्यु नंतर शंभर वर्षापर्यंत हा मुसलमानी झंझावात स्पेन पदाक्रांत करुन
पिरीनीज पर्वरांगा पार करुन फ्रान्स पर्यंत आला
ह्या झंझावाताच नेतृत्व डमास्कस स्थित उमईद घराण्याचा खलिफा नाव अब्दुल रहमान अल गफीक तीसरा या शुर पुरुषा कडे होते
ह्याने आपल्या नेतृत्वाखाली Toulouse आणी Garonne चे युद्ध जिंकले होते .
हे आक्रमण जेवा फ्रान्सवर आले तेवा
संबध युरोप आणी ख्रिस्ती जनता जागृत झाली ,
आस्तित्वावरील संकट उभे असता ,
चार्ल्स मार्केल (जन्म इ.स. 686 कार्यकाल ७१८ -४१) नेतृत्वाखाली आस्ट्रासिया,न्युस्ट्रिया,बर्गंडी,स्वाबिया,अँक्विटेन आणी लोंबार्ड राज्याच्या(इटली) च्या फौजा एकत्र करुन अरब आणी बर्बर मुसलमानांविरुद्ध क्रुसेड्स पुकारले गेले ज्यास इतीहास फ्रांक्स सैन्य संबोधते
फ्रांक्स सैन्यबल 15000-20000तर अरबी सैन्यबल काही 20 -25000 असे होते
काही अरबी स्रोतांनुसार 50000 आहे .
अरब सूत्रांच्या मते, फ्रँक मुस्लिम धर्माभिमान्यांना मारण्यासाठी आणी त्यांचे धैर्य कमी करण्यासाठी फ्रांक्स
त्यांच्या समोर डोंगराळ आणि झाडे असलेल्या भागतुन लढु लागले.ते चौकोनी व्युहरचनेच्या पद्धतीने अरबी सैन्याला अचानक वेढुन त्रस्त करु लागले
सात दिवसांपर्यंत, या दोन सैन्यांत किरकोळ चकमकी झाल्या होत्या. उमय्यादांनी आपल्या पूर्ण शक्तीची पराकाष्ठा करुन बघितली. 'अब्द-अल-राहमन,
एक शुर सेनापती असला तरीही तो निष्फळ ठरला होता कारण त्याला चार्ल्सनै आपल्या सैन्यावर लक्ष केंद्रित करण्याची आणि लढाईचे क्षेत्र निवडण्याची संधीच दिली नवती.
शिवाय, उमय्यादना मार्टेलच्या सैन्याची संख्या माहीती करणे अशक्य होते कारण चार्ल्सने झाडांना आणि जंगलांचा उपयोग त्यांच्या खऱ्या संख्या लपविण्याकरिता केला होता.
ही गनीमि काव्याचीच पद्धत !
Mozarabic क्रॉनिकल (754 इ.स.)म्हणते:
आणि युद्धाच्या धक्क्यामुळे उत्तरेकडील माणसे समुद्रासारखी हलवता येणार नाही अशी दिसत होती . ते एकमेकांच्या शेजारच्या बाजूने उभे होते अगदी अभेद्य बर्फाचे बांधकाम जणु आणि त्यांच्या तलवारीच्या मोठमोठ्याने वारानी त्यांनी अरबांना खाली आणले. आपल्या सेनापती भोवती गोळा होण्यास भाग पाडीले तेवा ऑस्ट्राशियन्सचे लोक त्यांच्यापुढे उभे होते. त्यांनी त्याना तलवारी खाली टाकण्यास भाग पाडीले .
चौरस फोडून उमय्यादच्या सैन्याने चार्ल्सला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या रहिवाश्यांनी त्यांना वेढले आणि वेढा तुटु दिला नाही. युद्ध अजूनही शांततेत होते-
फ्रॅन्किश इतिहास सांगतो-
उमय्याद सैन्यात हेरांमार्माफतर्फत अफवा पसरवली गेली
की फ्रॅंकिश तुकडी बॉरोदांपासुन घेतलेली लुट लुटणार !
उमायदादच्या काही सैनिकांनी एकाच वेळी युद्धाला सुरुवात केली आणि लूट सुरक्षित करण्यासाठी ते छावणीत परतले.
लढाईच्या मुस्लिम अहवालांनुसार,
दुसर्या दिवशी (फ्रॅन्किश माहीतीप्रमाणे लढायचा दिवस केवळ एक दिवस आहे), चार्ल्सने पाठवलेल्या फ्रँकच्या तुकडीनै शिविर आणि रसदीचा मार्ग (गुलाम व इतरांसह) लुटण्यास सुरुवात केली.
उमयाद बेस कॅम्पमध्ये अंदाधुंदी माजली होती तेव्हा
शक्य तितक्या गुलामांना मुक्त करण्यासाठी चार्ल्सने एक सैनिकी पथक पाठवले होते.
हे गुलाम सोडवण्यात यशस्वी झाले,
कारण उमय्यादच्या तळावर गेलेले बरेच सैनिक त्यांच्या छावणी त परत आले.
उर्वरित मुस्लिम दोन्ही इतिहास मान्य करतात की माघार थांबविण्याचा प्रयत्न करताना 'अब्द-अल-राहमन' त्यांच्या सभोवती फिरत गेले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला .
नंतर उर्वरित सेना नाश पावली

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...