Sunday 31 December 2017

पुस्तके :जुन्या मित्राची पुन्हा भेट.

पुस्तके ..जुना मित्राची पुन्हा भेट !

या विषयावर कविता करावी तरी उत्तमच होते परंतु काही गोष्टी अल्प शब्दात मांडाव्या इतक्या लवचिक खास नसतात .
डिसेंबर उजाडला की आंग्ल नववर्षाची चाहुल लागते,मनाला आपोआप कसलीशी हुरहुर लागते ,
गत वर्षातील आठवणींचे पट हळुहळु ओळीने डोळ्यासमोर तरळु लागतात
या आठवणींच्या निमित्ताने एकएक माणसे आठवु लागतात,आठवतात काही गतवर्षीस केलेले संकल्प ,ते पुर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न .
नविन संकल्प मनी बांधण्यासाठी वेळ मिळतो स्वतःच्या मनाच्या कानाकोपर्यात फिरण्यासाठी ,स्वतःच्याच मालकीच्या संपत्तीच मुल्यमापन करण्यासाठी ,
मन काय आहे हे भौतिकतेच्या पातळीवर जरी ज्ञात नसले तरी ,केवळ कल्पना करुन  तरी त्या मनाच्या भुतकाळ नामक कप्यात साठविलेल्या अनेक आठवणी ,घटना आणी सवयी यांच मुल्यमापन करु लागतो आणी ते ही एका वेगळ्या दृष्टीकोणातुन ,
  अशाचप्रकारांती आज एका दुरावलेल्या मित्राशी मैत्री पुन्हा वाढवावी
असा संकल्प मनी धरिला ,
दुरावलेला म्हणजे इयत्ता दहावी पर्यंत जी  मित्र म्हणुन होती ती ही पुस्तके फक्त ,
त्यांच्यासोबत बालपण संपुन किशोरावस्थेत कधी पोचलो याचा गंधच  लागला नाही ,खुप काही आठवणी या पुस्तकांसोबत आहेत
काही गोष्टींप्रती प्रेम त्यासाठी विरोध झाल्यावर वाढते तसच माझं झालं .
मी इ.पाचवी ते दहावी गावी योग्य शिक्षणाभावी  आत्या-मामा कडे पाथर्डीस होतो .
या पुस्तकासोबतच नातं वाढण्यास आमच्या आत्याबाई पुर्णतः कारणीभुत आहेत तसं त्याना शालाबाह्य पुस्तकवाचन जमत नसे  ,त्यांच्या या वागण्यास कारणही योग्य होते ,आजही ग्रंथालयाची बरीच पुस्तके माळ्यावर तेव्हा फेकली ती अजुन आहेत ,ती फेकली कारण माझ अभ्यासाकडे होत असलेल दुर्लक्ष ! या गोष्टीमुळे मी अभ्यास आणी वाचन
दोन्ही गोष्टींचा ताळमेळ जमविण्यास शिकलो ,
नंतर पुस्तकात पुस्तक घालुन वाचावयाचो ,ही गोष्ट आत्यास माहीती होती  हे मला आता गेल्यावर त्यानीच सांगितली ,
ती माळ्यावरची पुस्तके मी पुन्हा पाहीली आणी त्या जीर्ण पानांवरुन हात फिरवितानि मला जुना मित्र सापडल्याचा आनंद झाला ,
लहानपणी काही गोष्टीच वेड वेगळच असते नं ,काही कळत नसताना ही
मी गलेलठ्ठ कादंबर्या आणी पचावयास अवघड अश्या विचारी लेखकास वाचले ,त्यांच्याशी  मैत्री केली ,
  सुरुवात साने गुरुजींपासुन ते सावरकर -होमर पर्यंत .
आणी पाऊलखुणा ,पानीपत,मृत्युंजय पासुन मराठी, मुसलमानी रियासत  पर्यंत इ.नववीपर्यंत
वाचले ,
आणी दहावी वर्ष शनी च्या साडेसातीस घेऊन आले,ह्यास मी शापीत म्हणेन कारण हे वर्ष सुरु झाले आणी माझा मित्र कुठेतरी मजपासुन दुरावला ,
स्पर्धेच्या गर्दीत हरवला , तसा तो pdf रुपात कायम सोबत होता परंतु
या त्याच्या नव्या रुपात त्यास स्विकारण्यास त्याची सवय होण्यास वेळ गेला
आता पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षा त्याची जाणीव जास्त तीव्र झाली कुठेतरी वाटलं ,परतावे स्वतःकडे स्वतःच्या नैसर्गिक स्वभावाकडे
म्हणुन नववर्षाचा संकल्प मनी बांधिला ,हा मित्र पुन्हा जवळ केला .

बाजी©

Friday 29 December 2017

काव्य

काव्य सुचण्या करिता मन जीवंत असावे लागते
त्यात उत्कटता येण्यासाठी  दुःख सोसावे लागते
प्रकट होण्याकरिता धडधड असावी हृदयी,
त्यास धडकण्याचे कारण कोणीतरी असतेच
 

चढण

लोक उंच टेकडीसारखे असतात
ते सहसा वर चढु देत नाहीत
आपल्याला खुप जास्त प्रयत्न करावा लागतो
आणी जेव्हा तुम्ही सर्वास पार करुन
वर पोचताल
ते तुम्हाला डोक्यावर घेतील मग तुम्ही एक पाउल चालले तरी दहा पाउलाच अंतर कापलेल दिसेल परंतु हे सगळं होण्याआधी
दहापाउलाएवढा जड पाउल टाकावा लागतो ,तिथे पोचाव लागतं

Tuesday 26 December 2017

पैलतीर

सुवर्णवेळ सायंकाळची
               वाटते तिने सरुच नये
हरवुन स्वत्व पाहताना
              वाटते सुर्या तु बुडुच नये
निरव शांतता ऐसी हवेत
              वाटते येथुन उठोच नये
विसरतो संघर्षव्यथा पैलतीरी
                वाटते परतुच नये ,

Thursday 26 October 2017

सुर्य नभीचा

एकटा राहीलो इथे,
आपले कुणी दिसेना
नभांतरीसुर्यासम
सोबती कुणी असेना

वाटा त्रासिणार्या
खणोन आज रोधिल्या
सावल्या भेडिणार्या
जाळोन राख केल्या

दिवास्वप्ने मनीची
छाटुन संपविली
नाती जळमटांची
काढुन फेकीयली

आता

जाळोनी अंग स्वतःचे
तेज जगा द्यावयचे
स्वःतेजाने आपुल्या
नंभांबर प्रकाशावयाचे
बाजी©

Sunday 22 October 2017

अज्ञात रणरागिणींच्या शोधात १..रणचंडी झलकारी बाई.....


जब तक झाँसी स्वतंत्र ना करु,
न शृंगार करुंगी न सिंदुर लगाउंगी
अशी शपथ घेणारी तेजस्वी शलाका १८५७ च्या स्वतंत्र्ययुद्धात आपली चमक सोडुन गेली ज्या चमकेने सबंध पाश्चात्त्यांचे डोळे तेजाने दिपुन गेले ती झांशीच्या महालक्ष्मी ची सखी रणचंडी झलकारी बाई !
झलकारीबाई राणी लक्ष्मीबाईंच्या दुर्गा या स्त्री दलाची सेनापती !
प्रखर निष्ठा आणी मुर्तीमंत शौर्य उपजत घेऊन आलेली युद्धशलाका .
झलकारीबाईंचा जन्म २०नोवेंबर १८३० रोजी भोज या झाशी नगराच्या वायव्येस स्थित छोट्याशा गावात झाला .
वडीलांचे नाव मुलचंद  तर आईचे धनिया असे होते. त्या कोरी या समाजातील होत्या . त्या आईवडीलांच्या एकुलती एक संतान .वर्णाने सावळ्या परंतु रुपाने सुंदर अशी ही कन्या जन्मतः शुर होती कारण
भोज हे खेडे जंगलकिनारी असल्याने गावकर्याना हिंस्र पशु व लुटेरुंच्या टोळ्याना सतत तोंड द्यावे लागत असत.म्हणुन सर्व लोक शस्त्र निपुन होते.
झलकारीबाईं चे वडील झाशी संस्थानात सैनिक होते ते उत्तम तीरंदाज ही होते.आई देखील तशी शुर होती ,उभय दांपत्य हे धार्मिक वृत्तीचे म्हणुन हाच गुण झलकारीबाईंमध्ये देखील उतरला होता .
त्याचप्रमाणे मुलचंदने आपल्या मुलीस युद्धकलेचे  संपुर्ण ज्ञान दिले होते .
तिच्या शौर्याच्या अनेक कथा सांगितल्या जातात
त्यातीलच एक अशी की,
एके दिवशी झलकारीबाई गुरे घेऊन रानात गेली असता तिच्यावर चित्याने अचानक झडप घातली
तेव्हा धैर्यवान मुली बाजुला उडी मारुन स्वतःचा बचाव केला आणी हातातील लाठीने चित्याच्या नाकाजवळी वर्मावर असा प्रहार केला
की चित्ता जागेवरच निपचित होऊन पडला .नंतर तिने त्याला लाठीने इतक मारल की तो त्यातच मेला .
या कृत्याची सगळीकडे प्रशंसा केली गेली
तिच्या शौर्यगाथेतील एका घटनेत तिने गावच्या मुखियाच्या घरावर रात्री दरोडा घालण्यास आलेल्या दरोडेखोराला लाठीनेच बदडले होते आणी नंतर मुखियाने तिला आपली मुलगीच मानली .त्यानंतर तिची सगळीकडे प्रशंसा झाली .
नंतर झलकारीबाई वयात आल्या नंतर पुरणचंद ह्या झाशीसंस्थानात तोफखान्यावरील गोलंदाजाशी तिचे लग्न लावले गेले लग्नात मुखियाने गावभोजन दिले
आणी लग्नानंतर उभय दांपत्य झाशीस राजाराणीचा आशीर्वाद घेण्यास महालात गेले आणी इथे दोन दुर्गा प्रथमच एकमेकीना भेटल्या झलकारीबाई तील तडफ राणी लक्ष्मीबाईंनी हेरली आणी आपल्याच पदरी नोकरीस ठेवुन घेतले
इथेच एका अध्यायाची अथश्री झाली

राणीने सह्स्रचंडी याग करण्याचे काम झलकारीस दिले तो चंडीयाग होता
दुर्गादल स्थापिण्याचा आणी प्रमुख होती प्रत्यक्ष रणदुर्गा झलकारीबाई .
पुढे सन १८५७ उगवले .क्रांतीचे संवत्सर हे
सकल हिंदुस्थान बळावले फिरंग्यांविरुद्ध .
झाशीच्या किल्यावरुन महालक्ष्मी क्रुद्ध होऊन कडाडली
मेरी झासी नही दुंगी !
आणी
सहस्त्रचंडी यागाच्या ज्वाळेतुन निघालेल्या ज्वालाप्रमाणे सहस्र दुर्गा सहस्त्र भैरव झाशी च्या किल्यावर लढण्यास सिद्ध झाले .
23मार्च१८५८ सर ह्युजच्या नेतृत्वाखाली इंग्रजी तोफा गडावर आग ओकु लागल्या .
रण तुंबळ माजले .
खाशी राणी लक्ष्मीबाईंनी पुरुषी वेशात शत्रुसैन्यात घुसुन धडक मारली नंतर परत किल्यात येत्या झाल्या .
झलकारी विजेसारखी लढत होती फिरंगी कापत होती
गुप्तहेरांचे जाळे व बातम्या अचुक पोचवत  होती .
आणी घात झाला .
हिंदुस्थानचा अभिशाप फळास आला .फितुरी झाली. शत्रु किल्यात घुसू लागला .
झलकारीबाईनी दुलाजी ठाकुराची फितुरी राणीच्या कानी घातली
राणीने शेवटची बैठक घेतली ,खाशी मंडळी होती अंती झलकारीबाई बोलल्या
राणीचा वेश चढवुन मी किल्ला लढवावा .राणीने खाशा लोकांसहीत येथुन सुरक्षीत जागी जावे .आणी क्रांती कायम राखावी
जोपर्यंत झाशी स्वतंत्र होत नाही
ना मी शृंगार करेन नाही सिंदुर लावेल
हे जीवन स्वतंत्र्यासाठी .
राणी गहीवरलि परंतु रात्र वैर्याची समय असा अवघड पडलेला भावनांसाठी वेळ नव्हता राणी लक्ष्मीबाईंनी किल्ला सोडला परंतु महालक्ष्मी नसली तरी महाकाली अजुन किल्ल्याच्या तटावर अजुन होती
शेवट पर्यंत लढत राहुन शेवटी पकडली गेली .दुलाजीच्या माणसानी तिला ओळखले होते
लगेच तिने त्याच्यावर गोळी झाडली ,घोडा हलला आणी गोळी इंग्रज सैनिकास लागली या घटनेने ह्युज चिडला .
त्याने तिला कैद करुन पहार्यात ठेवले परंतु पिंजऱ्यात राहील ती वाघिण कसली
तीने पहार्यातुन सुटका करुन किल्याकडे पळ काढला
सकाळी ह्युज किल्यावरचे दृश्य पाहुन अवाक झाला .ते दांपत्य
पुरणचंद आणी झलकारीबाई तोफ लावत होते .
झटकन ह्युजने इशारा केला एक गोळी आली आणी पुरणचंद च्या छातीत लागली तो जागेवर गतप्राण झाला परंतु तरीही झलकारीबाई नी तोफ उडवली त्यात बरेच इंग्रज मेले  अंती एका इंग्रजी तोफगोळा लागुन तिच्यादेहाचे तुकडे आणी रक्ताचा अभिषेक तिथेच किल्यावर झाला क्रांतीची विज भयंकर कडकडाट करुन अनंतात विलीन झाली .

बाजी©

Monday 25 September 2017

पिडीतेच मनोगत

पिडीतेच मनोगत

निघाली अंत्ययात्रा माझी
सर्वजण रडत होते
वेळ गेल्यावर आज सगळे
माझी किंमत समजत

बलात्कार केला राक्षसानी
परंतु समाज तो पिशाच्च ठरला
त्यानी फक्त शरिर लुटले
समाजाने तर खुन केला

पुरुषार्थाचे भाट सारे
आज लाजेने चुर झाले
रक्षिणारे हात जेव्हा
भक्षण्यास कामी आले
पुरुषार्थाचे गोडवे गाण्या
आता चांदभाट होणार नाही
स्त्रीलज्जा रक्षिणारे
प्रताप शिवाजी होणार नाहीत
कारण
पुढारलेला समाज आजचा
विचाराने पांगळा आहे
21व्या शतकात राहुन
अवयवात आब्रु शोधत आहे

समाजमन गढूळ असल्यावर
मनाची पवित्रत कोणाला समजणार
आणी म्हणुन
शरिर अत्याचाराच बळी ठरल्यावर
दोषी देखील मिच ठरणार.

बाजी©
omkarpandav.blogspot.com

Monday 18 September 2017

हा रजनी गंध

हा रजनी गंध  छेडीतो तुला
बनोनी माझा सांगाती
सवे सत्तावीस ही नक्षत्र घेऊनी
चंद्र आला सोबती
आज सौदा प्रेमाचा करु
साक्षीला चंद्र आहे इथे
बंध आपुल्या नात्याचे रमणी
आज करु घट्ट इथे
बाजी©

तुज पाहता

तुज पाहता रमले मन असे प्रिये
विसरले भान अन् स्वत्व इये
तुझ आठविण्या गुंतलो बहु मी
प्रयत्नात विसरलो स्वत्ःस मनी

बाजी©
omkarpandav.blogspot.com

Saturday 16 September 2017

एक नजर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर !

एका स्वयपाकीनी ची जात शोधली वरुन गुन्हा दाखल केला !
शिव शिव शिव धर्म बुडाला !
आणी
दुसरे ,
   आमच्या जिवावर जगणारे बाह्मण आमच्याच बापजाद्यांच्या राज्यात
आमच्यावर कुरघोडी करायले !
आणी तीसरे
पुरोगामी महाराष्ट्रातली काळीमा फासली जाणारी घटना !
साले तीन्ही पण महा चु* !
 
महाराष्ट्राच पुरोगामित्व मात्र तेव्हाच धोक्यात येतं जे एखादी गोष्ट ब्राह्मण करील !
कारण ,
शांतताप्रिय समंजस समाज
काही प्रमाणात घाण सगळीकडे असतेच पण त्याच काहीच नाही 
पण आम्हाला राजकिय पोळी भाजायची संधी मिळते ती दवडुन कशी चालेल
आमचा महाराष्ट्र स्वतःला पुरोगामी म्हणतो 
     काय **चा पुरोगामी आहे का .?
आजही निवडणुकीत उमेदवारी पासुन ते पदा पर्यंत #जात
पहीले लागते .

आम्ही उमेदवार उभा करतो प्रभागातली त्या समाजाची लोकसंख्या बघुन !
बाकी त्या उमेदवाराच चरित्र्य वैगेरे गेल *कात .
आणी
निवडुण आल्यावर विकास फक्त त्याच भागाचा होतो ज्या भागात ह्या उमेदवाराची जात असते
आयच्या गावात पुरोगामित्वाच्या !
आता गावात येऊत !
   गावात पण
ज्या जातीची लोकसंख्या जास्त ते तिथले अनिभिषिक्त राजे बाकीच्यानी काही बोलायच नाही
  आणी कसलंच वर्चस्व राजकीय असो नाहीतर आणखी काही अजिबात
उडायच नाही उडले की उडले जगातनं
लोकशाही च्या आयच्या गावात !
आता गल्लीत जाऊ आमच्या गल्ल्याना कॉलनीला  आजुनही
  जातीवरुनच नाव आहेत बरं
तिथल्या चौकात नाव काय द्यायच
कोण्या जातीतल्या महापुरुषाच द्यायच यावरुन मारा मार्या
मग सामाजिक सलोख्याच्या आयच्या गावात !
हे झालं राजकिय !
आपल्या इकडे
  शाळा कॉलेजच admission पण जातीच concentration बघुन केल जात
पार संस्थापका पासुन ते ट्रस्टी पर्यंत पाहीली जाते
जात
नंतर admission ला आम्ही ओरडु ओरडु सांगतो
   आमची जात !
इथं समानते च्या आयच्या गावात !
मग आम्ही बाहेरा येतो शिकायला
इथ रीम बघताना
पहीले विचारतात गाव आणी नंतर आडनाव
उद्देश असतो
जात !
पुरोगामित्वाच्या आयच्या गावात !
इथंही कालेजात जातीवरुन बरेच ग्रुप आहैत त्यात भांडण ही आहेत ते वेगळं
इथ पोरगी आवडली एखादी तर पटवायच्या आधी पण बघतेत की ओ
जातं
प्रेमाच्या आयच्या गावात
आता सामाजिक
आमच्या संघटना स्वतःच्या कसल्याशा फालतु स्वाभीमान निर्मिती साठी सरसकट दुसर्या जातीची ,महापुरुषांची ,इतीहासाची एवढच नाहीतर त्या जातीतल्या स्त्रियांची पण खालच्या पातळीवर जाऊन विटंबना करतात
तेव्हा पण आमचा पुरोगामी महाराष्ट्र गप्प असतो .
लहानपणा पासन सगळ्यात जास्त पोट्ट्यांवर काय बिंबवले जात असेल तर ती असते जात
संस्कार नंतर !
इतीहासात पहीले कोणत्याही महापुरुषाची profile वाचताना आम्ही शोधतोच
जात
इतीहासात आम्ही कोण कोण्या जातीचा हे सिद्ध करुन आजही आम्ही
मारामार्या करतो
इथही
आयच्या गावात पुरोगामित्वाच्या !
आणी म्हणे पुरोगामी महाराष्ट्र !
   हा महाराष्ट्र सोयिस्कर पुरोगामी बनलाय
समानतेच्या गोष्टी करतायत
जातीशिवाय पान हलत नाही ,
     आम्ही मागास आहोत कारण आम्ही ह्या जातीचे आहोत
आम्ही मागास आहोत कारण आम्ही स्त्रिया आहोत
पोराला वेगळी फिस
पोरीना वेगळी
ह्या जातीला इतकी त्या जातीला तितकी फिस
आमची गरिबी अजुन ही जात बघुन येतो मग
कस काय महाराष्रातली जनता पुरोगामी म्हणवते स्वतः ला

बाजी पांडव राक्षसभुवनकर
टिप.
हा लेख काही पुण्याच्या खौले प्रकरणाची तरफदारी करण्यासाठी नाही
मि वैयक्तिक त्या घटनेचा निषेधच करतो
लेखाप्रपंच यासाठी की
यामुळे बिघडत असलेला सामाजिक सलोखा !
बाजी©

जगावे नव्याने

वाटते आज मज जगावे नव्याने....
कुजत चालले दिवस जीवनी
  विसरावे ताप बहु निरस यौवनी
विचारांची तुफाने
  .............. संपवावी नव्याने
वाटते आज मज.जगावे नव्याने ..

बाहु पसरावे ...धुंद लहरावे .
बेबंद उडावे क्षितीजाकडे...
मावळतीच्या गंधीत दिशेला
आज स्वस्थतेने
पहावे नव्याने...
वाटते आज मज जगावे नव्याने

बाजी©

Saturday 26 August 2017

एक असंग सहवास

सुंदर खळखळणार्या नदी काठी खुप पक्षी येत असतात...
    पहीले तर ते अनोळखी असतात आगंतुकासारखेच ...
अंतर असते त्यात ...आपल्यात...
      हृदयांत मनात विचारात ....अनभिज्ञ पुर्णतः
         परंतु काळा ने हळुहळु कसलीशी बॉंडीग बनते
त्यांच्यात आपल्यात...
रोज तीच नदी तीच जागा तेच पाणी हे सगळ असल तरी मन मात्र त्या पक्ष्यांनाच शोधत असतं..
वास्तविक त्यांची आपली कसलीही ओळख नसते,
कसले संभाषण नसते तरीही ,
       एक धागा अज्ञातपणे बांधला गेलेला असतो ....
हृदयाचा आपल्या ....त्यांच्याशी..
कदाचित त्याना कल्पना नसते ..ते गुंग असतात आपल्याच धुंदीत ....
आणी
अचानक एक दिवस ते पक्षी तो थवा निघुन जातो .....
   आणी
आपण मात्र ,
आपली नजर मात्र शोधत असते
....त्यांच्या पाऊलखुणा.....
कसली भावनेची नाळ असते ही ?

बाजी©
       

Sunday 20 August 2017

सांग ना

आता मि इथे तु तिथे मन कुठे हरवले
सांग ना सांग ना

हे इथे कसे धुके शहारीती
शोधितो मि तुला
परि तु न दिसशी  ग मजला 
आहे कुठे ?हे प्रिये ,

सांगना सांग ना

ह्या इथे एकटा मी
सोबती मन हे
बरसती धुंद सरी
मन ही धुंदले बरे

सांग ना सांगना

दुर तु आहे तरी
भास हे का तुझे
निवांत बघ मी बैसलो
स्वप्न हे का तुझे ?

आता मि इथे तु तिथे मन कुठे
हरवले
सांग ना सांग ना

बाजी©
जीवनअर्घ्य
२०अॉगस्ट२०१७

Wednesday 16 August 2017

एकट एकट

एकट एकट बसलं की सुचेनासं होत
रिकाम्याश्या डोक्यात काहुर उभ राहतं
शुन्यात जाती डोळे माझ भान विसरल जात
फिरत फिरत मन भलं तुझ्याजवळ येत
उनाडत ते बागडत फडफडत ते तडफडतं
मन पाखरु उनाडस जस रानी उंडारतं...
,.
.#बाजी

गलती

जखम जखमपर देते जाना
अब
आदत तुम्हारी बनी हुयी है
अनुज समझ के माफ करने की
फितरत हमारी छुटी है
छोड दिया था उस घोरी को
दिल्लीपती चौहानने
बहलोल को छोड के मिट गये
प्रतापराव जवानी मे
हो गयी थी इतीहास मे ....
....कुछ गलतीया हमारी भी ...
क्या बार बार दोहराये इनको ...
..
.....
क्या सिख मिली इतिहास की.....
.......
....बाजी©

अल्फाज ए धडकन ..broken heart series

Y1]
   
दो दुनिया के रास्ते मिलतै हो जहा क्या मिल पायेंगे हम वहा
दुर क्षितिज की रेखाओ से क्या  लिख सकेगे दास्तान्
लब्जो का तो खेल नही है, इशारो से की बाते नही है
आपके खामोशी ने ही तो सारी बाते बया हुयी है
4]
मर कर तुझपे बरबादी होगी
 यह क्या हम  जानते थे ?
सौदेबाजी मे हारेंगे दिल
 क्या हम कभी जानते थे?
वैसे तो  कभी हारने की 
फितरत न थी हमारी
जब नजर ए मिलाफ हुआ 
तो हारने कि वजह मिल गयी

बाजी©

5]तेरे इश्कमै बुरे हालात का बेटा हु उसी बढाया मुझे

मै बुरे वक्त का चेला हु उसी ने पढाया मुझे 


मे बदनामी का डर रहा नही
बरबाद ए दिल के जिंदगी मे 
नाम की अब जरुरत क्या है 

इस दर्द की कोई दवा दिला दो
करे कबुल इबादत वो खुदा दिखा दो
यु घुटघुटकर नही जी सकते अब हम
कत्ल करे जज्बात ए दिल ऐसा जहर पिला दो

असर ए इश्क छा गया है कुछ इसतरह ए जान
कि अब अपने ही दिल मे खुदको ढुंढ रहा हु

सोचता हु बोल दु अब तुम्हे या नही
सोचता हु राज दिल के खोल दु या नही
फितरत हमारी कुछ बेजुबा यु अब
सोचता हु कागज पे लिख दु या नही 

होंगे जुदा जानते थे फिर भी वादा किया था 
गिर जायेगी दिवार ख्वाबोकी जानते थे
     फिरभी....वादा किया था
सुख जायेगा खुशीका तालाब जानते थे
     फिर भी......वादा किया था
जितेजी हमे मौत मिलेगी जानते थे
    फिर भी तुझे गलेसे लगाकर मरने  का
फिर भी वादा किया था
बाजी©
6]
 ना जान पावोगे हद ऐ दिवानगि
आजमाइश कर हद ए इश्क की
सीना चीर कर देखने का ख्वाब देख रही हो
वहा तो तु खुद का नाम  ही पाओगी
इम्तेहा की इस रस्म मे तुम बडी पछताओगी
मार के अपने आशिक को तु झे जालीम

7]
डरता था दिल कि किसी पर यु ही न आये उतर कर
कातील फितरत जानता था  बे वफा की
बाजी© 

८]
कुछ छोड गयी थी तुम शायद
कुछ लौटाना बाकी था
मिल गये थे हम राहो मे
बस पता पुछना बाकी था
कुछ भुल गयी थी तु  शायद
याद दिलाना जरुरी था
मेल बनाने कुछ लब्जो का
कुछ तो बोलना बाकी था
.
.बाजी©
10]
हम गैरो को अपना समझे 
यह गलती नही हमारी है
हर गैर मे तेरी मौजुदगी
यह दिल की दिवानगी है
मत समझ परवाना हमे
हम जल न सकेंगे तेरे लिये 
एक तमन्ना बसि है दिल मे
जिना ही है तेरे लिये
जिंदगी कि हर कदम पर 
एहसास यह होता रहा है
दिल तो बनाया रेखाओ से 
अब रंग बता भरना कहा है
#बाजी©
10)
अपनी हो तुम कहता है दिल 
समझ नही पाते हम कभी
नाम लिया जो तुने किसी का 
जल उठता है मन कभी 
क्या हलचल है नही जानते हम 
क्या तुम पहचान गयी हो
मोहब्बत करते है हम तुमसे
 क्या तुम जान गयी हो
बाजी©
11)
नाम लेता है तेरा  कतरा भी खुन का मेरे
सांस ढुंढती है गंध मोजुदीकी तेरे
आंखे ढुंढते है हर वक्त शबाब ऐ हुस्न तेरा
दिल धडकता है हरपल यादो मे तेरे
बाजी
12)
सवाल है रिश्ते मे कई लेकीन दिल जवाब ढुंढ नही सकता
मेरे हर बात का मतलब तुझे मै बता नही सकता
हर वक्त तुझे लगता है परेशान करता है सवाल मेरे
लेकीन सच तो यह है की ,
यह दिवाना इजहार ए मोहब्बत अभी कर नही सकता
बाजी©


१५] नही बचे मुकम्मल  अल्फाज
       जाने वाले कैसे रोक लु तुम्हे
       जिसने दी दिल खोलकर यादे
       उस से और क्या मांगु मै 
बाजी© 
16] तकलीफ हो तुझे
      ऐसा लब्ज नही बोलेंगे
       अकेले सह लेंगे हम
       अकेले मर जाएंगे
       गुमनाम खत की तरह
      बस याद मे रह जाएंगे
बाजी© 
17] 
19]ख्वाबो मे तेरा वजुद नही रहा
      अब आँखो ने मेरे सोना बंद कर दिया
      नही रोते हम तेरी याद से आजकल   
       है दिल ने धडकना बंद कर दिया
20
      दर्दद तमाशा दुनिया को दिखाना मक्सद नही शायरी का मेरे
      नही बोल सकते जिस दर्द को लकीरो मे दबा देते है 

21]क्या मोहब्बत मेरी तेरे लिए इक मजाक था
      मै एक खुषमस्करा और इश्क चुटकुला था
     वैसे दिख तो सब रहे थे साथी मेरे
      मगर जब दिल मे झाक कर देखा तो 
     अंधेरा नजर आया
बाजी© 
२२]
        23]
 क्यो लुटेरो के काफीले बदनाम है
 यहा लुटेरा जमाना है यारो
   नही होता दरिंदा जन्मसे कोई
 यह जमाना मजबुर बनाता है यारो
24]दिल्लगी इतनी ही थी मेरी ,
दियाँ थी वह परवाना मै था
परवाह नही थी उसे दिवाना मै था 

बाजी©
२४]ऐ हवा 
 वह नही जाती बता के ,खाली तु तो देखा कर
 उस अपने की गंध से मुझे मोजुदगी बताया कर 
बाजी© 

न कोई बात होगी
न मुलाकात होगी 
होगी तो बस अब  
उसकी बारात  और
मेरी जनाजा ए मौत होगी
©baaji_pandav

ए मोहब्बत की मेरे
मुकदमेमे न कोई सुनवाई
न मुआफी होगी 
होगी तो बस अब 
मुझे सजा ए मौत  होगी

©baaji_pandav

उनको नजरअंदाजगी की वजह
नही है अब
दिल की मय्युसियत की दवा
नही है अब 

©baaji_pandav

हम तो साथ परछाई के 
तक काट लेंगे जिंदगी  
बस्स अब सुरज तेरा 
तेरे सरसे हटने की देर है
©baaji_pandav

काश 
तु उस दिन 
न हसी होती 
तेरी मुस्कान पे यह 
जान न कुर्बान होती

©baaji_pandav

काश मै तेरे हाथ की वह कलम होता
उस बहाने ही सही मै तेरे साथ होता
बोल नही सकती जो मन की बात तु
  अपने आल्फाजो मे सही उतार देता

©baaji_pandav

काश तेरे अंबर का 
बादल मै बना होता 
तेरे हर एक रंग को
खुदसे यु सजा पाता 
फिर
भिगोने तेरे दिल को
यु कभी बरस जाता
©baaji_pandav

काश की तेरे साँसो की 
गंध मै बन पाता 
उस गंध को जिने
की जरुरत बना लेता
तु बन जाती रंग होली का 
और मै रंगनेवाला
पाणी ही बन पाता
©baaji_pandav

काश जिंदगी का हर
लम्हा तेरे संग जी लेता
हर सुखदुःख को मेरे
तेरे हसीं पे लुटा पाता 
नही था मै उतना खुशनसिब
काश तेरे दिल को यु
दिलसे मेरे जोड पाता 

©baaji_pandav

काश तेरे मन मे यु 
अपने की तरह रह पाता 
परछाई बनकर तेरी मै
ठंडक की तरह समा पाता
नही थी मेरे नसिब मे
तुम्हारी मोहब्बत कभी भी
काश तेरे दिल को यु
अपने हातो से मै रंग पाता
©baaji_pandav

जालीमो भरी दुनिया मे इन्सानसे वफा उम्मीद ना कर 
कभी जानवरो से लगाव कर वफा की बखान जानोगे
बाजी©

8]
इस गलतफहमी ना रह की हम भुल ना पायेंगे तुझे 
पथ्थर भी नरम हो जाते हे समय से लडते हूये

9]दुआ भी उसकी खैरत 
की मांगता रह वह
बदनसिब 
तुट चुका था जो न लब्ज
बोलणे लायक था
हर वो बहाणा आपकी 
चाहत का 
दफना रहे है आसुओ 
के समंदर तले
अब आशिकी बस मौत से है !


बाजी©

कुछ इस कद्र टुट चुके थे हम
न देखा पलटकर उन्होने
न हमने उन्हे पुकारा 

Omkar R pandav ©
बाजी©
All rights of material and poems are reserved ©
omkar radhakrushn pandav (bajirao)

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...