Tuesday 3 September 2019

आयुष्य नावाच्या राज्यात


कोणाला दैव देते ,कोणाचे दैव नेते
इथे काही कर्माने,स्वतःचे दैव निर्माण करतात
काही दैवाने दिलेले,कर्माने गमावितात
आयुष्य नावाच्या राज्यात   बुद्धी  राजा  आणी मन  राणी  असते, विचार प्रधान आणी नीती म्हणजे मंत्री असतात
यात कोणी नीतीमुल्यांच्या  आणी विचारांच्या सल्ल्याने वागून कर्तुत्ववान होतात तर काही  मन रुपी चंचल राणीच्या आहारी जाऊन , राज्याच्या शरीर नामक सिंहासनाचा अनिर्बंध वापर करुन  आयुष्याची माती करुन घेतात .
सर्वानाच सगळं काही मिळत नसते इथे प्रत्येक गोष्ट कर्तुत्वाने मिळवायची असते ,धैर्य नावाचा सैनापती आणी जिद्दीच सैन्य त्यामागे उभं करावं लागते , प्रयासाने आणी धैर्याने
आयुष्यात हारजीत पचवून राज्य राखावे आणी वाढवावे लागते,कठीण काळाच्या भट्टीतूनच बलशाली राष्ट्र आणी चरित्रे निर्माण होत असतात हे खरे.
आपल्याच राज्यात अनेक गुणरत्नांच्या खाणी दडलेल्या असतात ,प्रयास आणी अभ्यास पुर्व त्या शोधून ,खोदून काढाव्या  लागतात .त्या गुणरत्नाना प्रयत्नांचे पैलु पाडून जगासमोर त्यांची चमक दाखवावी लागते ,ती त्यांच्या नजरेत आणून द्यावे लागते .
चमकत नाही तोवर सोनेतरी कुठे मातीमध्ये ओळखु येते नाही का !

बाजी राधाकृष्ण
omkarpandav.blogspot.com

insta id.  https://www.instagram.com/p/B18UrCBlOvh/?igshid=r1p3owncl40z

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...