Thursday 28 January 2016

अशांततेच मुळ

अशांतीच मुळ शांतता असते
कारण
शांत रहाल तर लोक तुम्हाला गृहीतच धरणार नाहीत,
ते बोलत राहतील
तुम्ही ऐकत रहाल,
शांततेतन जर काही साध्य झाल असत तर आंदोलनं युद्ध आणी क्रांत्या
झाल्याच नसत्या
तुमच्यात जर क्षमता असेल पराक्रम असेल तर कठीण परीस्थिती असली तरी ही पंख पसरवा
निदान उडता आल नाही तरी हवेत तर तंरगताल नंतर उडण्याची क्षमता तर निर्माण होईलच की.
कारण
संकट ही पराक्रमाची जननी
आणी
सत्ता ही पराक्रमाची दासी.
पराक्रम जखडल्या जखडणे अवघड!
तो समुद्राच्या लाटांप्रमाणे असतो
एखाद्याने कितीही तुम्हाला अडवायचा प्रयत्न केला तरी
आत्मिक बल जर समर्थ असेल तर
तर कोण अडविण्यास समर्थ?
म्हणुन
आतुन अशांत रहाल
तर नवनिर्मिती कराल!
  स्तःला ओळखा! आणी पंख पसरावा
भरारी मारण्याची हीच वेळ आहे !
पंखात आपोआप बळ येईल.
  

No comments:

Post a Comment

पानिपत काव्य

प्रलयलोटला सागर उठला  खणाणल्या समशेरी महाभारतासम रण दिसले कुरुक्षेत्राची भुमी भाऊ सदाशिव रणात तांडव काळाग्निसम करीत भिडले शिंद्याचे रण भैरव ...